June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुध्द धम्म प्रचार – पहिला धम्मोपदेश , धम्म प्रचार उपक्रम , धम्मोपदेश चळवळ , बुध्दाचा अखेरचा संदेश, अत् दिप भव।

पहिले दोन अनभिज्ञ शिष्य

मे महिन्यातील वैशाख पौर्णिमेला पूर्व भारतातील गया शहराजवळ बोधीवृक्षाखाली ध्यान करीत असतांना सिध्दार्थास संबोधी प्राप्त झाली. शाश्वत सुखाचा शोध लागला व सिध्दार्थ गौतम बुध्द झाले. बोधीवृक्षाच्या जवळून जाणाऱ्या त्रुपूरस्सा व भाल्लीक व्यापाऱ्यांनी बुध्द्धास ध्यानस्थ बसलेले असतांना पाहिले व त्यांच्या जवळचे मधयुक्त भोजन बुध्दास संबोधनीनंतर प्रथम दान केले.

त्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर बुध्दाने त्यांना प्राप्त झालेला नवीन अनुभव सांगितला, तेच बुध्दाचे पहिले अनभिज्ञ शिष्य होत. बुध्द त्यावेळी वयाने पस्तीस वर्षाचे होते.

प्रत्येकाच्या मनात प्रश्न असू शकतो की संबोधी म्हणजे काय ? संबोधी ही मनाची शुध्दावस्था होय. ह्या अवस्थेत मन अज्ञान, अंधकार, द्वेष व उत्कट इच्छापासून मुक्त असते अभिजात व आकलनक्षम अशी मनाची अवस्था प्राप्त झालेली असते.

पहिला धम्मोपदेश

बुध्द आता आपल्या धम्माची शिकवण देण्यास पूर्ण तयार झालेले होते. त्याने स्वतःशीच प्रश्न केला की प्रथम धम्माची शिकवण कोणास द्यावी. त्यांना त्यांच्या पहिल्या शिक्षकांची आठवण झाली. अलारकलम व उधकराम. परंतु त्यांचे ह्यापूर्वीच निधन झालेल होते. नंतर त्यांना त्यांच्या पांच मित्रांची आठवण झाली ज्यांचा त्यांनी संबोधीपूर्वी त्याग केला होता. मृगवनात पाटण्याजवळील सारनाथ येथे ते हयात होते. गयेपासून ते ठीकाण शंभर मैल दूर होते.  बुद्ध त्याठिकाणी गेले मृगवनात सारनाथ येथे पांच शिष्यांना पहिला धम्मोपदेश केला. त्यास धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखले जाते.

धम्मोपदेशानंतर ते पांच सन्याशी बुध्दाचे पहिले शिष्य झाले त्यांनी पुढे बुद्धांच्या तत्वांचा प्रचार केला व धम्माचे प्रथम पाईक म्हणून कार्य केले.

धम्म प्रचार उपक्रम

मृगवनात भगवान बुद्ध विहार करीत असतांना एका प्राप्त:काळी नवयुवक यश बुध्दाजवळ आला. ज्याने श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतलेला होता. बुद्धाची शिकवणूक त्याने ऐकली. जीवन हे दुखमय आहे. त्यात मानवास अनेक प्रश्नास सामोरे जावे लागते. त्रास सहन करावा लागतो. ह्या सर्वप्रश्नावर केवळ बुद्धाचा मध्यम मार्ग हाच एक उपाय होय. तेव्हापासून यश बुध्दाचा शिष्य बनला. लवकरच बुध्दाने यशाच्या पत्नीस व पालकांस (आईवडीलास) धम्म दिक्षा दिली. यशला ५४ मित्राचा परिवार होता. पुढे त्यांनी सुध्या धम्मात प्रवेश करून ते बुद्धाचे शिष्य बनते. त्यासर्वांना लवकर संबोधी प्राप्त झाली. अशा अरहंत भिक्खूची संख्या पुढे वाढत गेली.

धम्मोपदेश चळवळ 

बुध्दाच्या शिष्याची संख्या आता बरीच वाढली होती. या सर्वांना बुद्धाने आदेश दिला की प्रत्येकाने वेगठीकाणी जाऊन प्रत्येक माणसाला सत्याच्या मार्गाची शिकवण द्यावी आणि स्वत:सुद्धा धम्मोपदेशासाठी दूरच्या भ्रमंतीवर निघाले .

सतत पंचेचाळीस वर्षे बुध्दाने सत्याच्या मार्गाचा संदेश लोकापर्यंत पोचविण्याचे कार्य केले.  दुःखमुक्ती मार्गाची शिकवण दिली फक्त पावसाळ्याचे दिवस वगळता सतत बुध्दाच्या संघाने, भिक्खू भिक्खूनीणी धम्मोपदेशाचे कार्य देशाच्या उत्तर पूर्व भागात केले. बुध्दांच्या अथक प्रयत्नामुळे व शिष्याच्या भ्रमंतीमुळे भारतात बुध्द धम्म प्रस्थापित झाला. इ. स. पूर्व ५८८ मधील ही घटना होय.

बुध्दाचा अखेरचा संदेश

वयाच्या ऐशीत्या वर्षी मल्लदेशाची राजधानी कुशीनगर येथे ‘चंद लोहाराकडे भोजन घेतल्यामुळे बुद्ध आजारी पडले.  बुध्दाने त्यांच्या जवळच्या शिष्यास आनंदात सांगितले की, चंदा ह्यास कळवा की तुझ्याकडून मिळालेले हे आमचे शेवटचे भोजन आहे.  त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तू दिलेले भोजन फलदायी व महत्वाचे आहे. माझ्या आजाराबद्दल आपण स्वतःला दोषी मानू नये.

बुध्दाने निर्वाणासाठी मल्ल राज्यातील कुशीनगरजवळ साक्षात निवडून त्याकडे प्रस्थान केले व आनंद शिष्यास सालवृक्षामध्ये मंचक तयार कण्यास सांगितला व त्या मंचकावर उजव्या कुशीवर बुध्द शांत व सावध झोपले. सर्व भिक्खू त्याच्या सभोवती होते. ती वैशाख पौर्णिमा होती. जरी ते अंतीम क्षण मोजत होते तरीही त्यांच्याकडे धम्म संदेशाची याचना केली ती बुध्दाने आनंदाने स्विकारली व धम्मोपदेश देण्यास तयार झाले. त्यावेळी सुभद्र, अनेक याचक व गरीब लोक बुध्दाचा शेवटचा संदेश ऐकण्यासाठी आली होती. तेव्हा दोन सालवृक्षाच्या खाली मृत्यू मंचकावर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सर्व शिष्याना खालील प्रमाणे संदेश दिला.

तुम्ही शिक्षकाविना नाहीत मी जरीही आपल्यात नसलो तरी धम्मतत्व व नियम जी आपणास शिकवणुकीतून सांगितलेली आहेत ती आपल्यासोबत आहेत.

भिक्खूनो । शरीर नाशवंत आहे. प्रत्येक सजीव घटक नाशवंत आहे. स्वतःची मुल स्वतःच्याच परिश्रमाने करावी.

अत् दिप भव।

बुध्दाचे हे शेवटचे शब्द होते. त्यांचा चेहरा सुवर्ण प्रकाशाप्रमाणे तेजोमय दिसत होत. त्यांचे मन वरवर परमानंद प्राप्त करीत होते. शेवटी निर्वाण प्राप्त केले व कायमस्वरूपी जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांची शिकवण आपणा सर्वांना मार्गदर्शक म्हणून सदैव जगामध्ये आहे. त्यांच्या शिष्यानी भिक्खु व भिक्खूनीणी बुध्दाची शिकवण आजही सांभाळलेली आहे जतन करून ठेवली आहे.

Buddha Dhamma Prachar