बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी अज्ञानात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला जो ज्ञानाचा मार्ग दिला त्याला तोड नाही. बौध्द साहित्यात जेवढे बोधिसत्त्व होऊन गेलेत त्यात आमचा बोधिसत्व भीमराव यांना तोड नाही. महाप्रज्ञावान, कुशल नितीतज्ञ्, कुशल राजतज्ञ्, प्रकांड पंडित,कुशल मार्गदाता,ज्याचा बुद्धीचक्षु समस्त प्राणिहीतकारक, संकटाचे नियोजन करणारा, नाग भूषण बोधिस्तवाला तोड नाही. ज्यांनी मानवजातीला शोषित पीडित दबल्या कुचल्ल्या समाजाला दिशा दिली. बोधिसत्त्व स्वतःसाठी कधीच जगत नसतात. त्यांच्या सोबत त्याच्या परिवाराला दुःखातून जावे लागते. स्वतःसाठी किंवा परिवारासाठी न जगता समाजासाठी जगतात. ते मानवजातीच्या कल्याणाचा लढा लढतात. त्यामुळे परिवारावर दुर्लक्ष होते . म्हणून मी म्हणतो असा बोधिसत्त्व बौध्द साहित्यात होने नाही. माझ्यातरी वाचण्यात आला नाही.
त्यांनी प्रथम गुलाम बनवणाऱ्या संस्कृतीवर हल्ला केला. शिक्षण याला महत्त्व देऊन ज्ञानाचा विकास करून घेतला. त्यातील पहिला हल्ला होता येथील विषम संस्कृती ज्यांनी जन्मापासून ते मारणापर्यंतच्या अधिकारापासून बहुजनांना दूर केले. एवढेच नाही तर आपल्या जन्माच्या उत्पत्ती समंधी आगळे वेगळे नियम तैयार केले जेथे चांगले निर्माण होईल त्यापासून तुम्हा आम्हाला वंचित केले.
समस्त विश्वाचा मार्गदर्शक बुद्ध कधी कसा जन्माला आला तो परत जन्माला येऊ नये. म्हणून नियोजन बद्ध आखणी केली. कारण या बुध्दानी आमच्या संस्कृतीवर आघात केला अज्ञानी लोकांना संज्ञान केले त्यामुळे पुढे असे घडू नये. बहुजनांत विद्वान बुद्धिमान जन्माला येऊ नयेत यांची रीतसर पणे आखणी केली. समाजात अपभ्रश पसरवीला त्यातील एक भ्रश आपणास सांगणे गरजेचे वाटले.
तो भ्रश आहे जन्मासमंधी
आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बारकाईने वाचला असल्यास त्यात बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतम यांच्या जन्मासमंधीचे वर्णन खंड एक मध्ये दिलेले आहे. त्यात सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माची पूर्व घटना सांगितलेली आहे. त्यावेळी सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज आषाढी पौर्णिमेच्या एक आठवडा पूर्वी आषाढी मोहत्सव साजरा करीत असत. राजा ते प्रजा त्यात भाग घेत त्यांचा समारोप आषाढी पौर्णिमेच्या दिवशी करीत. या उत्सवात राजा शुद्धोदन व रानी महामाया यांनी सुद्धा भाग घेतला होता. सात दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असे. रानी महामाया आषाढी पौर्णिमेच्या सकाळी जागली सुगंधित जलाने अंघोळ केली अलंकार वस्र धारण केले नंतर चार लाख सुवर्ण मुद्रा गोर गरीबांना दान दिल्या व्रत धारण केले. शरीर आणि मन प्रसन्न झाले आणि *त्या रात्रीत दोघे एकत्रित आले प्रसंग खूप रोचक आहे. या प्रसंगात सत्य दडलेले आहे. त्या रात्री दोघे एकत्र आले व माता महामाया हिला गर्भ धारणा झाली. याचाच अर्थ आषाढी पौर्णिमेचा दिवस गर्भ धरण्यास योग्य होता. असे डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथात लिहतात.
आषाढी पौर्णिमेला वरील इतिहासिक घटना घडल्या.
# राजा शुद्धोदन व माता महामाया याचा एकांत
# बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतम याचा गर्भ प्रवेश
# सारनाथ येथे धम्मचक्क पवत्तन सुत्ताचा उपदेश
# पाच तपस्वी प्रथम भिक्षु झाले.
# भिक्षु संघाची स्थापना (संघदिन )
आपले भविष्य अंधःकारमय व्हावे म्हणून आपला इतिहास पुसून टाकला होता हे आपणास आत्तापर्यन्त का कळले नाही. त्यावर अंबलबजावणी का झाली नाही. आता आपण अज्ञान आहोत म्हणून सजग व्हावे.
आषाढी पौर्णिमेचा अपभ्रश आखाडी पौर्णिमा असा झाला. आखाडी असा उल्लेख आज सुद्धा खेड्यापाड्यात प्रचलित आहे.
सहजासहजी बहुजन समाजात लग्न हे भर उन्हात एप्रिल, मे, जुन या महिन्यात होतात. शरीर लाही लाही होते असा तो काळ बाकी ऋतूमध्ये आपण लग्न काढत नाही डोक्याला शीतलता प्रदान होईल असा काळ आपणास योग्य वाटत नाही. असो लग्न झाल्यावर मुली सासरी जातात आणि नंतर जशी आषाढी पौर्णिमा जवळ येते तशीच माहेरच्याची मुलीला माहेरी आणण्याची तैयार जोरात सुरु होते. कुणी तरी भाऊ नातेवाईक जाऊन आषाढी पौर्णिमेच्या आठ दिवसा अगोदर मुलीला तिच्या पती पासुन वेगळे केले जाते आषाढी पौर्णिमेच्या दिवशी (आखाडीच्या) मुलगी माहेरी तिचा नवरा त्यांच्या घरी असा नियोजित परंपरा इथल्या कुंठीत संस्कृतीने बहुजन समाजाच्या मनात निर्माण केली. बहुजन भोळाभाला….
आषाढी पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध महापुरुष गर्भात प्रवेश करतात त्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येते. म्हणून
बहुजनाच्या घरात बुद्ध व त्यांच्या सारखे तस्सम विद्वान स्वविचारी प्रज्ञावान जन्माला भविष्यात येऊच नये म्हणून नियोजित अंधश्रद्धा, भितियुक्त विचार , असत्य धर्माचा आधार देऊन इथल्या बहुजणांना अंधारात ठेवण्यात आले आणि काही तर जाणून बुजून अज्ञानात राहणे पसंद करतात याला काय म्हणावे? येथील बहुजन जागतील तेव्हा जागतील पण जे १४ ऑक्टोबर १९५६ चे दीक्षित आहेत असे बौध्द धर्मीय लोक अशाप्रकारचे आचारन करत असतील तर त्यांचा धिक्कार असो. अज्ञानातून बाहेर निघाल्यावर सुद्धा परत अज्ञानात जाण्यास उत्सुक असतील तर काय म्हणावे हेच समजत नाही. समजले असेल तर अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशात प्रवेश करावा. बुद्ध बोधिसत्त्व याचा श्रद्धा भावाने स्वीकार करावा. अधश्रद्धा ही खूप डोकावली आहे त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रन्थ वाचावा. शेतकरी ज्याप्रमाणे मशागत केलेल्या शेतीत योग्य पाऊस आल्यावर बीज पेरतो त्याचप्रमाणे गर्भाचे बीज पेरण्यासाठी आषाढी पौर्णिमेचा दिवस योग्य वेळ आहे. म्हणून माझ्या आया बहिणींना विनंती आहे लग्न झालेल्या आपल्या मुलींना आषाढी पौर्णिमेला घरी आणू नका व सासरकडील लोकांनी आपल्या सुनेला माहेरी पाठवू नका. आमच्या वेळी आमची आई नक्कीच आखाडीला माहेरी असणार म्हणून आमची उपज अशी झाली. पण यानंतर येणारी पिढी धार्मिक संस्कारीत बुद्धीवान प्रज्ञावान गुणी समाजाचा आदर्श निर्माण करायचा असेल तर वरील संस्कार जरूर करावा. उत्पत्ती जर घरी छान जन्माला आली तर त्यांचे गोड फळ तुम्हाला चाखायला मिळतील. गर्भ बीज योग्य वेळी धारण करा अशीच विनंती करेल
_आषाढी पौर्णिमेला सुनेला पाठवू नका मुलींना आणू नका
_
जनहितार्थ पोस्ट फॉरवर्ड करू शकता.
धन्यवाद
धम्म चक्क पवत्तन व वर्षावास प्रवरणा दिनाच्या मंगलमय शुभेच्छा🙏
आपला हितचिंतक
कल्याणमित्र
आचार्य डॉ बोधी मिलींद
milinddawale05@gmail.com
संदर्भ ग्रन्थ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu