June 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मुलांना बुद्धधम्म कसा शिकवावा 1

एक समस्या

ही समस्या प्रामुख्याने अशी आहे । बौद्ध मातापित्यांनी आपल्याच मुलाना बुद्धधम्म चांगल्या तन्हेने कसा शिकवायचा?
इतर मुलांना बुद्धधम्म शिकवण्याची संधी त्यांना कचितच मिळत असते. बौद्धेतर आईबापाची तर गोष्टच सोडा. मी याची पोकळ तात्विक चर्चा करू इच्छित नाही. माझ्या स्वतःच्याच मुलांच्या बाबतीतील माझा प्रत्यक्ष अनुभव मी आपल्याला सांगणार आहे सर्वसामान्य पाश्चिमात्य मुलांच्या बाबतचा अनुभव मी आपल्याला सांगणार आहे. सर्वसामान्य पाश्चिमात्य मुलांच्या बाबतचा अनुभव असाच असेल. सदैव ख्रिश्चन आणि आधिभौतिक सुबत्तेच्या वातावरणात अथवा परिसरात वावरणाऱ्या पाश्चिमात्य मुलांनाच विशेष करून बुद्धधम्म शिकविण्यासाठी योजनाबद्ध शिक्षणक्रमाची अधिक निकड असते. बौद्धधम्मीय देशात तेथील मुले बुद्धधम्माच्या परंपरेत अखंड बुडालेली असल्यामुळे तेथील मुलांचा धम्मशिक्षणाचा प्रश्न काहीसा सोपा असतो. अशा अनुकूल परिस्थितीत आणि वातावरणात चांगली आणि परिणामकारक अशी योग्य बुद्ध शिक्षणपद्धती विकसित झाली असेल. समजा, अशी पद्धती विकसित झाली असली तरी कसलाही विचार न करता तिची तंतोतंत नक्कल करणे ही पाश्चिमात्यांच्या संदर्भात मोठी चूक ठरेल आपण अगदी वेगळ्याच परिस्थितीत राहात आहोत. त्यामुळे बुद्धधम्माच्या शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपणाला दुर्लक्ष करता येणार नाही. भगवान बुद्धांनी आपणाला प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहायला शिकविले आहे; प्रत्येक गोष्टीचे नीट निरीक्षण करूनच स्वत चे निष्कर्ष काढावेत, दुसन्यांवर आंधळ्याप्रमाणे विश्वास ठेवू नये अशी त्यांची शिकवण आहे. ज्याप्रमाणे प्रत्येकाने स्वतः च्या प्रयत्नानेच निर्वाणापर्यंत जायचे आहे, त्याप्रमाणेच पाश्चिमात्य परिस्थितीला साजेशी बुद्धधर्मीय शिक्षणपद्धती आपणच जाणीवपूर्वक विकसित करायची आहे. याबाबत इतर देशांकडून मिळालेले मार्गदर्शन किंवा सूचना आपण साभार स्वीकारल्या पाहिजेत. आम्ही अशी आशा करतो की अशा अनेक सूचना आणि इतरांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील. मुलांच्या वयोमानावरच मुख्यत्वे कोणताही शैक्षणिक कार्यक्रम अवलंबून असतो. ‘आईवडिलांचे वागणुकीचे उत्तम उदाहरण’ हा कोणत्याही शिक्षणक्रमाचा महत्त्वाचा भाग असतो. आईवडील बौद्धाप्रमाणे उत्तम आचरण करीत असतील, तर मुलांना ते उत्तम मार्गदर्शक ठरते. मुले कोणत्याही वयाची असोत, मुले आपली निरीक्षणशक्ती नेहमीच विकसित करीत असतात. अनुकरण करणे हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, या तत्त्वाकडे आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात धम्माचे आचरण करण्यात आईवडील किती यशस्वी होतात यावरच सर्व गोष्टी अबलबून असतात. त्यामुळे बुद्धधम्माप्रमाणे आचरण करणे हा नित्याचे जीवन जगण्याचा मार्ग आहे, धम्मावर केवळ वायफळ गप्पा मारण्यासाठी धम्म नाही याचीही जाणीव सर्वांना असली पाहिजे.

बाह्य मदत

अनुकरणाबरोबर इतर बाह्यांगे अगर बाह्य वस्तू मुलांच्या लहानपणात महत्त्वाची भूमिका बजावीत असतात म्हणूनच कोणतेही बौद्ध कुटुंब वा घर बुद्धप्रतिमेशिवाय, बुद्धरूपाशिवाय असूच शकणार नाही. मूर्ती ठेवता आली नाही तर निदान बुद्धाचा फोटो, कॅलेंडर काहीतरी घरात असले पाहिजे. प्रत्येक मुलाची स्वतःची बुद्धमूर्ती, बुद्धप्रतिमा घरात एखाद्या स्वच्छ ठिकाणी विराजमान केलेली असणे ही एक साधी पण उत्तम कल्पना आहे. त्याच्यासमोर मूल रोज दिवा लावू शकेल, उदबत्ती लावू शकेल, फुले वाहू शकेल. म्हणजेच त्याची ते मूल स्वतः पूजा करू शकेल. रंगीत कागदाच्या कंदिलात ठेवता येईल. अगर मेणबत्ती लावली तरी चालेल. या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कर्मकांड म्हणून एका प्रतिमेची तो मुलगा पूजा करीत नसतो, तर मानवतेचा महान गुरू, शिक्षक म्हणून तो बुद्धाची पूजा करीत असतो, आदर प्रकट करीत असतो, हे कोणीतरी त्याला समजावून सांगितले पाहिजे. यातून कर्मकांडाचा एखादा पूजाविधी निर्माण करणे हा उद्देश नाही, अशा तऱ्हेच्या साध्या आणि सोप्या पूजाविधीतून मुलाच्या हृदयात, मनात बुद्ध ठसवायचा आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रौढ बौद्धांसाठी असे विधी साह्यरूप होण्याऐवजी बेड्या किंवा बंधनच ठरतील, असे केवळ पूजाविधी करून आपण काहीतरी मिळविले आहे एवढे जरी त्यांना जाणवले तरी पुरेसे होईल. आणि तेवढेच अशा पूजाचे महत्त्व असते. प्रौढांना आवश्यक असला तरी, बुद्धधम्माचा तत्त्वज्ञानविषयक आशय मुलांच्या आकलनाच्या दृष्टीने काहीसा दुर्बोधच असतो. तरी पण मुलांना बौद्ध जीवनपद्धतीकडे नेण्यासाठी आवश्यक बाह्योपचार म्हणून अशातऱ्हेच्या साध्या सोप्या विधींचा आपण उपयोग करायला हरकत नाही. बुद्धाला फुले वाहणे, उदबत्ती लावणे, दिवा लावणे आदी नेहमीचे नेत्रदीपक बाह्योपचार मुलांना आवडत असतात. पूज्यबुद्धी आणि श्रद्धा विकसित होण्याला याचा उपयोग होतो.

उत्सवांचा उपयोग

मुले नैसर्गिकपणे उत्सवप्रिय असतात. बौद्धेतर मुले तर अनेक उत्सव साजरे करीत असतात. बौद्ध मुलांना प्रत्येक महिन्यातून एकदा किंवा दोनदा उपोसथाचा दिवस साजरा करता येईल. हा दिवस इतर दिवसापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल. अगदी सर्वसाधारण रविवारपेक्षाही अगदी वेगळ्या पद्धतीने दर महिन्यातील पौर्णिमा आणि प्रतिपदा या उत्सवासाठी राखून ठेवणे पाश्चिमात्य देशात नेहमीच शक्य होणार नसल्याने, त्यांच्या नजीकचा रविवार निवडून उपोसथाचा दिवस म्हणून साजरा करता येईल. या उपोसथाच्या दिवशी आपले नेहमीचे काम तात्पुरते थाबवता येईल. प्रत्येकजण त्या दिवशी शील पालन करण्यावर लक्ष केंद्रित करील. आईवडिलांनी त्या दिवशी धम्माबद्दल माहिती सांगावी आणि मुलांच्या मनावर धम्माचे संस्कार करावेत. पण हे उत्तम तऱ्हेने कसे करता येईल ?

ही गोष्ट प्रामुख्याने मुलांच्या वयोमानावर अवलंबून असते हे यापूर्वीच सांगितले आहे. या लेखात मी फक्त दहा वर्षांच्या मुलांबद्दलच बोलणार आहे. यापेक्षा लहान वयाची मुले असणाऱ्या आईवडिलांनी यापुढे जे काही सांगितले आहे ते सोपे करून सांगावे आणि मोठ्या वयाच्या मुलांच्या आईवडिलांनी थोडेसे खोलात जावे अर्थात् हे मुलांच्या आकलनशक्तीवर आणि बौद्धिक कुवतीवर अवलंबून राहील धम्मपदाचे भाषांतर आणि ‘लोटस ब्लॉझम’ हे भिक्खु सिलाचाराच्या लेखाचे छोटेसे संकलन ह्या दृष्टीने आवश्यक ती स्फूर्ती देईल.

आईवडिलांनी वेळोवेळी बुद्धाच्या आख्यायिका/ दंतकथा मुलांना वाचून दाखवाव्या. जातककथाही वाचून दाखवण्यास हरकत नाही. जोपर्यंत ह्या गोष्टीतील नीतितत्त्वे मुलांच्या मनावर आपण ठसवतो आणि अनैतिक तत्त्वे काळजीपूर्वक समजावून सांगतो तोपर्यंत ह्या सुंदर जातककथांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण नाही. जर शाळेमध्ये मुलांना ग्रीक पुराणातील भाकडकथा शिकवल्या जातात, ग्रीक देव आणि इतर देवामधील भयानक, क्रूर युद्धे वाचावी लागतात, तर आपण आपल्या मुलांना जातककथा सांगण्याचे का टाळावे? या गोष्टींमुळे भारतीय विचारधारेशी मुलांची तोंडओळख होईल आणि कर्म आणि कर्माचे फळ ह्या संकल्पना त्यांच्या मनात नैसर्गिकरीत्या पण नकळत उसण्यास उपयोग होईल. कर्म आणि कर्माचे फळ या कल्पना समजण्यासाठी बौद्धिक तर्कवादाची अगदी कमीतकमी आवश्यकता असल्याने ह्या संकल्पना मुलांना सहज समजावून देता येतील. वास्तविक त्यावरून बुद्धाची सर्वच शिकवण मुलांना समजावून सांगता येईल. फक्त योग्य मार्गानि ही शिकवण द्यावी लागेल. मुलांना बुद्धधम्म सांगण्यात टाळाटाळ करणे ही मोठीच चूक म्हटली पाहिजे. काही बौद्ध मंडळी ‘शाकाहार’ आदी क्षुल्लक गोष्टींवर विनाकारण भर देतात आणि बुद्धपद्धतीनुसार स्वत च्या मुलांचे संगोपन करण्याकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष करतात
( भाग १ ) क्रमशः…….