मानसिक गुणांचे संवर्धन आणि
उच्चाटन करते शिक्षण…..
जगात वावरण्या साठी होते,
विद्यार्थ्यांचे सर्वांगिण रक्षण…
समाजहित साधण्यास अवतरला ,
ज्योतीबा नावाचा सूर्य….
सावित्रीबाईंनी गिरवली ,
भूईच्या पाटीवर अक्षरं….!!!!!
अपेक्षा न ठेवता मोबदल्याची ,
वंचितांना ओढले शिक्षण प्रवाहात…
करुन अक्षरांशी सोयरीक,
चाखवले अमृत ज्ञानाचे…..!!!!!
विद्येनेच मनुष्यास येते श्रेष्ठत्व,
अशी एकही वस्तू नाही जी विद्येविणा साध्य …..
नियमबद्ध शिक्षण नाही आता पचत,
भांडवलशाही ठरली शिक्षणाला गतिरोधक…..
बुरसटलेल्या विचारांनी कुजत आहेत मेंदू,
शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही,
गुरुविणा ज्ञानार्जन नाही…..
छाटले जात आहेत अंगठे संधी साधून,
नविन पिढी आज झाली वंचित ,
आयुष्याचं शिखर गाठतांना..…
वंचितांनी असावे वंचित,
असे षंढांचे कारस्थान…..
अव्वल असूनही पडले ओसाळ,
त्याच्या हुशारीची बीजं….
प्रगती साठी शिक्षकांनी व्हावे जबरदस्त,
शिक्षण आहे वाघिणीचं दूध करावे सिद्ध….
तेवत ठेवूया तथागतांची तत्वप्रणाली,
ज्ञानार्जनाच्या माध्यमातून….
होई सम्यक विचारांची पेरणी,
प्रज्ञा, शील, करुणेने ठेवू सम्यक संकल्प…..
अर्चना चव्हाण, नागपुर.
DBA __नागपुर जिल्हा सचिव व उपक्रम प्रमुख, यवतमाळ जिल्हा मार्गदर्शिका….
8624062012
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण