June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

शाळेत नाव नोंदणीसाठी धर्मांतरित बौद्धांच्या पाल्यांना जातीचा उल्लेख करण्याच्या सूचना

मुंबई : राज्यातील धर्मांतरित बौद्धांना त्यांच्या पाल्यांचे बालवाडी किंवा पहिलीच्या वर्गात नाव दाखल करताना धर्माची व जातीची नोंद करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना दिल्या आहेत. मात्र, धर्मांतरित बौद्धांनी कोणत्या जातीची नोंद करायची, असा प्रश्न निर्माण होणार असून, ग्रामविकास विभागाचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे २२ जानेवारी २०२१ च्या अर्धशासकीय पत्राचा संदर्भ देऊन ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रे पाठवून, धर्मांतरित बौद्धांच्या पाल्यांचे शाळेत नाव दाखल करताना धर्माच्या रकान्यात धर्माचा व जातीच्या रकान्यात जातीचा उल्लेख करण्याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना द्याव्यात असे कळविले आहे. ग्रामविकास विभागाचा हा निर्णय प्रामुख्याने अनुसूचित जातीतील धर्मांतरित बौद्ध पालकांसाठी आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींनाही साहाय्य करण्याच्या सूचना आहेत.

जाती व्यवस्थेला नकार देण्यासाठी ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांनी त्यांच्या मुलाची जात कोणती लिहायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच शाळेच्या दाखल्यावर धर्माचा, जातीचा उल्लेख करण्याची सक्ती करणे चुकीचे आहे. असेही आंबेडकरवादी संघटनांचे म्हणणे आहे.

 

इतिहास नोंद आणि संदर्भ खालील प्रमाणे 

पुरावा १

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे
खंड १८
भाग ३
१९४६ ते १९५६
बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे
? पान नं ५२२

“त्याचप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे, आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय”

आता विचार करा…… वरील वाक्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टच म्हटले आहे… ते बाबासाहेबांच्या भाषणाच्या खंडात आहे…. त्यावरून हे स्पष्टपणे समजते कि….. बाबासाहेबांनी हेच समजावले आहे कि….. बौद्ध धम्मात जातीच नाहीत…. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर पुर्वजांची महार, मांग जात जाते.

निदान हे वरील वाक्य स्वतः पुस्तकातून वाचून…. बौद्ध धम्मानंतर पुर्वजांची जात लिहूच नये….. इतर कोणीही तुम्हाला बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर पुर्वजांची जात लिहा असे सांगत असेल तर…. त्यांचे न ऐकता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबत भाषणातून बोलून दाखविले आहे. तर निदान या महामानवांचे तरी ऐका.

पुरावा २

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे
खंड १८
भाग १
१९२० ते १९३६
समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्य बुद्धीने झटले पाहिजे
? पान नं १८ – १९

“अस्पृश्यता व जातीभेद ही नावात साठविलेली आहेत. हे सर्वस्वी खरे आहे आणि ती नावे लुप्त केल्याखेरीज भागायचे नाही, आम्ही आपली जातीवाचक नावे सोडून फक्त चालणार नाही तर आमच्याबरोबर सर्व जातीनी आपली जातीवाचक नावे सोडून सर्वांनी सर्वसाधारण असे एक नाव धारण केले पाहिजे. माझ्या मते सर्वांनीच फक्त हिंदू असे म्हणावे व जातीवाचक पोटनावे काढून टाकावीत. कोणी स्वतःस ब्राम्हण, मराठा, महार,मांग, इत्यादी न म्हणता फक्त हिंदू असे म्हणावे तेणेकरून समाजात समता उत्पन्न होऊन एकी होईल. हिंदू म्हटल्याने कोणास कोणाचा तिरस्कार वाटणार नाही. कोणी कोणास हीन लेखणार नाही व कोणी कोणास श्रेष्ठ मानणार नाही”

?वरील बाबासाहेबांच्या भाषणातून काय दिसून येत आहे? …. तर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारण्याच्या अगोदर म्हणजे हिंदू धर्मात असताना एका भाषणातून…. त्यांना हिंदूच धर्मात सर्व जाती नष्ट व्हाव्यात व सर्व समानतेने स्वतंत्र जगावे असे वाटत होते…. जर हिंदू धर्मात असताना बाबासाहेबांना ब्राम्हण, मराठा, महार, मांग या जातीच नको होत्या तर बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर या पुर्वजांच्या जाती….. खासकरून महार मांग व इ. या जातींचा उल्लेख बौद्ध धम्मात तरी कशाला पुन्हा चालवून घ्यायला त्यांना कसे आवडेल? जर हेच बाबासाहेबांना आवडत नव्हतेच…. तर तुम्ही आम्ही कोण आहोत?….. बौद्ध धर्मात हिंदू धर्मातील महार जातीचा उल्लेख करण्याचा एवढा अट्टाहास का? परिवर्तनवादी बुद्ध धम्माच्या ऱ्हासाला पुन्हा बळी पडण्याचेच कुटिल कारस्थानच दिसतेय! म्हणूनच बाबासाहेबांच्या सच्च्या सर्व अनुयांयीनो सदैव जागृत राहून यांचा कुटिल डाव हाणून पाडा!!…. बाबासाहेबांनी जीवाचे रान करून…. एक ही रक्ताचा थेंब न सांडता परंतु स्वतःच्या रक्ताचे पाणी करून बहुजणांना स्वाभिमानाने जगता येईल…. विज्ञानवादी विचार करता येईल असा बुद्ध धम्म दिला तर तुम्ही…. मोठमोठे शहाणपणा लढवून पुन्हा बौद्ध धर्मात पुर्वजांच्या सोडलेल्या महार जातीचा उल्लेख करायला सांगता! …. बाबासाहेबांच्या अपार मुल्यवान मेहनतीवर….आणि समाजाविषयी त्यांनी हृदयाशी बाळगलेल्या त्यांच्या सुखस्वप्नावर मातीच पेरत आहात….. खरे तर तुम्ही बाबासाहेबांशी गद्दारीच करीत असल्याचा पश्च्याताप तुमच्या मनाला वाटत कसा नाही …… खबरदार!! जे बाबासाहेबांची मेहनत, स्वप्न तुमच्या मुर्खपणामुळे बरबाद केलात तर….. बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी तुमच्या अशा नीच विचारांना तोडीसतोड उत्तर देईल.

आता येथे काही जणांचे असे म्हणने असेल कि.
आपण महार जात जी पुर्वजांची जात नाही लावली तर आरक्षण मिळणार नाही तर अशांसाठी.

पुरावा ३

महाराष्ट्र शासनाने ( राज्यातील नवबौध्द समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा / योजनांचा लाभ अनुज्ञेय असल्याबाबत.) ( शासन परिपत्रक क्रमांक: अशैसं-२०१७/प्र.क्र. १६३ /का-५) या जीआरप्रमाणे. च्या परिपत्रकामधील मजकूर दिलेला आहे परंतु तुम्हाला संपुर्ण जीआर वाचण्यासाठी पुढे या लेखासोबत महाराष्ट्र शासनाचे जीआरचे स्क्रिनशॉट (फोटो ) शेअर केलेले आहेतं…. तर कृपया अधिक माहितीसाठी स्क्रिनशॉट { लेखासोबत जोडलेले फोटो पहावेत})

परिपत्रक :-
दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धर्मांतर करुन बौद्ध
धर्माचा स्विकार केला, त्याचबरोबर त्यांच्या बहुसंख्य अनुयायांनीसुध्दा बौद्ध धर्माचा स्विकार केला. या बौद्ध धर्म स्विकारलेल्या त्यांच्या अनुयायांना, अनुसूचीत जातीचे लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनाने नवबौद्ध संबोधून अनुसूचित जातीचे कायदेशीर लाभ महाराष्ट्र राज्यात दिलेले आहेत.

बौद्ध धर्मातील कोणत्याही व्यक्तीस सन १९९० पर्यंत कायदेशिररित्या अनुसूचित जातीचे
लाभ केंद्र शासन देत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवबौद्ध असे संबोधून डॉ. बाबासाहेब
आंबेंडकरांच्या बौद्ध धर्म स्विकारलेल्या महाराष्ट्रातील अनुयायांना अनुसूचित जातीचे लाभ दिलेले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेंडकरांचे अनुयायी असलेल्या धर्मांतरीत बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ देण्यासाठी “ नवबौद्ध ” ही संज्ञा वापरलेली आहे. धर्माने ते खर्‍या अर्थाने बौद्धच आहेत. म्हणून महाराष्ट्रातील नवबौद्धांना कायदेशिररित्या बौद्ध म्हणून समजणे अनिवार्य आहे व त्यांना बौद्ध अल्पसंख्याक म्हणून सन १९५६ पासून कायदेशिर दर्जा आपोआपच प्राप्त झालेला आहे. असे असल्याने, ते अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्यास कायदेशिररित्या पात्र आहेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 201709281611349814 असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

हे वरील पडताळणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन जाऊन अधिक आणि सत्य माहिती करून घेता येईल…..

तसेच हे वरील परिपत्रक वाचल्यानंतर काय लक्षात येते? तर…. ज्यांनी बौद्ध धर्मांतर केले आहे त्यांनी पुर्वजांची जात लिहिणे गरजेचे नाही….. एकदा धर्मांतर झाल्यावर पुन्हा मागच्या धर्माची जात लावणे हे कसे चुकीचे आहे यावरून दिसतेच ना!…..

जणगणनेच्या फॉर्ममध्ये पुर्वजांची जात लिहा नाहीतर आरक्षण मिळणार नाही असा खोटा प्रचार केला जात आहे…. जर आरक्षण फक्त बौद्ध धम्म आणि प्रवर्ग Sc लिहूनही आरक्षणात घट होत असेल तर त्या संघटना सरकारकडे दाद का नाही मागत?? ते आपल्याच माणसांना पुन्हा महार मांग होण्यास का सांगत आहेत?? हे सर्व आक्षेपार्ह असे का वाटत नाही कुणाला?

परंतु फक्त लोकांनी स्वतःहून विचार करावा किंवा योग्य आणि सत्य माहिती मिळवण्यास प्रयत्न करावा हि विनंती.

पुरावा ४

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे
खंड १८
भाग ३
१९४६ ते १९५६
बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे
अखंड चर्चा
पान नं ४९६

याभागात जे बौद्ध धर्म स्विकारणार होते त्यांच्या मनाची घालमेल आणि त्यात उच्चवर्णीयांकडून टिंगलटवाळीमधून होणारा त्रास…. यामध्ये दिलेले आहेत…. पुस्तकातून प्रत्यक्ष तुम्ही वाचा…. (येथे फक्त तुम्हाला खात्री व्हावी म्हणून त्याच पानावरचे दोन ओळी खाली दिलेले आहे.. ते वाचा.

काही ठिकाणी गंभीरपणे, “आता आपल्या गावातील मंडळी आणि ” बामण ” काय म्हणतील याची चर्चा चाललेली दिसली. काही ठिकाणी कोणतातरी वृद्ध माणसाला ” पंढरीला ” जाण्याची थट्टा तरुण मंडळी करत होती”

यावरून तुम्हाला समजेल तेव्हा धर्मांतराच्या काळात काही लोकांनी घाबरून धर्म बदलून बौद्ध धर्म स्विकारला नाही….. आणि ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यामध्ये काही लोकांनी बौद्ध धर्म स्विकारला परंतु त्यांनी त्यांची हिंदू महार जात सोडली नाही….. आणि याचा परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीच्या मुलांवरही झाला आणि ते बौद्ध धर्म लिहून महार जात आतापर्यंत लिहू लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे ‘महार’ ही ‘हिंदू ओळख’ नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने जात ‘महार’ व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले आणि हे फारच चुकीचे आहे….. हे लोक धर्मांतरानंतर एकदम महार जात सोडायला घाबरले होते…. पाप लागेल…. ब्राम्हण काय बोलेल…. असेच ना! ना ना शंका त्यांच्या मनात येत होत्या….. त्यामुळे ते बौद्ध धर्म स्विकार ऊनही घाबरून जात महार जात आतापर्यंत लावत राहिले आहेत….. त्यामुळे अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता. जर समजा ज्यांनी बौद्ध धम्म स्विकारला आहे परंतु ते अजूनही महार जात म्हणून लावत असतील…… परंतु या लोकांनी फक्त “बौद्ध” म्हणूनच स्वाभिमानाने ठाम राहिले आणि त्यानुसार कोणत्याही अर्जात…. १००% बौद्ध हे बौद्धच जसे बाबासाहेबांना पाहिजे होते तसे दैनंदिन व्यवहारातही राहिले.….. २% जे अजूनही हिंदू महार जातीत आहेत.परंतु बौद्ध धर्म ज्यांनी स्विकारला आहे त्यांनी.. बौद्ध धर्म म्हणूनच कुठल्याही अर्जावर लिहावे व त्यानंतर महार जात लिहिण्याची घोड चुक कुठेही करूच नका.

हिंदू धर्मात एकूण ३७४३ जाती आहे…. त्यात अनुसुचित जाती म्हणजे अजा ( SC ) प्रवर्गात एकूण ५९ जाती आहे.. आणि ह्या ५९ जातीमध्ये शीख, बौद्ध सोडून बाकी सर्व हिंदू धर्मातील जाती आहेत…. आणि अनुसुचित जातीला एकुण १३ % आरक्षण आहे… त्यात बौद्ध धम्म जास्तीत जास्त पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या समुदायाने घेतला म्हणून बौद्ध धम्मातील ( महाराष्ट्र शासनानुसार – नवबौद्ध….. याबाबत सुरुवातीला माहिती दिलेली आहे ) अल्पसंख्याक म्हणून अनुसूचित जातीत आरक्षण मिळते…. त्यात बौद्ध धम्मातील लोकसंख्या वाढत चालली आहे.. त्यामुळे १३% टक्के आरक्षण अनुसुचित जातीतल्या सर्वांनाच लाभ मिळेल हे असंभव आहे….. तसेच महार जातीत एकुण ५३ पोटजाती आहे….. आता विचार करा…. हिंदूंमधील महार जातीचे आरक्षण टिकवण्यासाठी ज्यांनी गुलामाची जाणीव करून देणारी जात सोडली आणि बौद्ध धम्म स्विकारला तर त्यांना तीच पुर्वजांची जात लिहून पुन्हा महार मांग बनवायचे का? जर महाराष्ट्र सरकारने बौद्ध धम्म स्विकारलेल्या जनतेला कायदेशीररीत्या अल्पसंख्याक म्हणून आरक्षण मिळणार असे सांगितले आहे तर का बौद्ध जनतेला पुर्वजांची जात लिहिण्यास सांगायचे??…. आणि जे लोक महार जात लिहा असे सांगत आहे तर आता सांगा महार जातीत ५९ पोटजाती आहेत तर मग बौद्ध धर्मानंतर जात महार आणि जी काही पोटजात असेल तर ती सुद्धा लावायची का???? असाही प्रश्न सहज होऊ शकतोच. याबाबत ते काहीच कसे सांगत नाहीत? तरीही कुणी चुकीचे मार्गदर्शन लोकांना करू नये.….. बाबासाहेबांनी फक्त बौद्ध धम्मच दिला आहे जात नाही हे मनाशी पक्के ठरवावे. कुणाच्या चुकीच्या सांगण्यावरून अजिबात स्वतःला संभ्रमित होऊ देऊ नका. आणि स्वतःच्या स्वाभिमानाला अजिबात ढळू देऊ नका.

पुरावा ५

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे
खंड १८
भाग ३
१९४६ ते १९५६
भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्व आहे
पान नं :- ४६४ – ४६५ – ४६६
पानं नं ४६५ आणि ४६६ वरील…. शेवटचा परिच्छेद.

“दुसर्‍या कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. माझी इच्छा आहे की, तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा या वर्षी स्वीकार करावा. मी या बाबतीत तुमच्यावर सक्ती करणार नाही. हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहणार नाहीत. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, विधीमंडळ – लोकसभा यातील राखीव जागांची मुदत घटनेप्रमाणे फक्त दहाच वर्षाची आहे. ती मुदत लवकरच संपेल. आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागांच्या पांगुळगाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही”

येथे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की,…..”माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही.”……. येथे बाबासाहेब स्पष्टपणे बोलत आहे कि…. बौद्ध धम्मानंतर ते अस्पृश्य राहणार नाहीत…. म्हणजे याचा अर्थ काय…. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म स्विकारण्याच्या आधी जन्माने हिंदू महार होते…. आणि हिंदू महार म्हणजे अस्पृश्य समजणारी मागासलेली जात होती…. आणि आता त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला तर ते अस्पृश्य नाही म्हणजे ते हिंदू महार नाहीत….. जर बाबासाहेब बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर स्वतःला हिंदू महार समजत नव्हते तर ते स्वतःला बौद्ध म्हणून समजायला लागले तर…. हे लोक कोण आहेत जे…. बौद्ध जनतेला पुन्हा महार म्हणून लिहा असे सांगणारे? बौद्ध हे बौद्धच असणार आणि आहेत.

आणि…. आता हे वाचा….. जे लोक बौद्धांनी पुन्हा महार लिहा किंवा पुर्वजांची जात लिहा असे सांगत आहेत. कारण त्यांना असे वाटते की, ….. हिंदू महार जातीचे आरक्षण निघून जाईल…. तर त्यांच्यासाठी खास हे बाबासाहेबांचे अनमोल बोल आहेत….. ते नक्कीच मन लावून वाचावे…. हे वाक्य खरतर ते विधीमंडळ – लोकसभा यातील राखीव जागांची मुदत याबाबत आहे. पण पुढील वाक्य हे खुप महत्वाचे आहेत. कारण बाबासाहेबांचे स्वप्न होते माझा समाज हा स्वाभिमानाने जगावा म्हणून. या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी हे वाक्य वाचा …. ते ही बाबासाहेबांना मनापासून आपले म्हणून मानत असाल तर….. ” आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागांच्या पांगुळगाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही ” …… मी यासाठी वाचायला सांगितले कारण…. जे लोक पुर्वजांची जात महार लिहा असे सांगत आहे ते लोक…. जे धर्म बौद्ध आणि जात कोणतीही नाही असे म्हणत आहेत. अश्यांना ते म्हणत आहे कि ” तुम्ही बौद्ध धर्माचा उल्लेख केल्यानंतर जात नाही लिहत तर तुम्ही नसलेला स्वाभिमान दाखवून काय सिद्ध करता?”….. अश्यांना फक्त एवढेच सांगावेसे वाटेल….. कि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण माझ्या बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंदू धर्मातून ते ही पुर्वजांच्या महार जातीतून बाहेर काढून बौद्ध धम्म देऊन जीवनदान दिले…..आणि ज्यांच्याकडे स्वाभिमानच बिनबुडाचा आहे ते, ‘हिंदू महार’ जातच लिहा असेच सांगणार… आणि अश्यांना हेच सांगावेसे वाटते की, जर अनुसुचित जातीचे आरक्षण बौद्ध लोकांनी बौद्ध लिहिले म्हणून कमी होणार. म्हणून तर वरील बाबासाहेबांचे महत्वाचे अनमोल बोल लक्ष घेऊन वाचावे….. जर एखाद्या जातीची आरक्षणामुळे अजूनही शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगती झाली नसेल तर सरकारकडे संघटीतपणे दाद मागा… सरकारला प्रश्न विचारा…. त्यांना वेठीस धरा….. पण बाबासाहेबांनी समाजाला प्रगत करण्यासाठी विज्ञानवादी बुद्ध धम्म दिला आहे. तर पुन्हा बौद्ध समाजाला हिंदू महार जातीत नेऊन पुन्हा बौद्ध धर्माच्या र्‍हासाला कारणीभूत होऊ देऊ नका….. आता कुठे हा मागासलेला समाज बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय….. बाबासाहेबांचे वरील विचार तरी वाचून चिकित्सक बुद्धीने विचार करा.

पुरावा ६

(बौद्ध, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस करावयाचा अर्ज) याबाबत माहीती खाली आहे…. तसेच अधिक माहितीसाठी लेखासोबत फोटो दिले आहेत ते पहावे.

याचे लेखासोबत स्क्रिनशॉट (फोटो) शेअर केलेले आहेत ते प्रथमतः पहावे….. त्यात

पान नं १ मध्ये
“अनुसूचित जाती” हे वेगळे म्हणून लिहिण्यात आले आहे तर “बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती” असे वेगळे लिहिण्यात आले आहे….. खालीलप्रमाणे:-

(अनुसूचित जाती, बौद्ध धर्मांतरीत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस करावयाचा अर्ज)

म्हणजे :- अनुसूचित जातीत एकूण ५९ जाती आहेत. त्यात पूर्वाश्रमीचे महार म्हणजे आताचे बौद्ध सोडून कोणीही धर्मांतर करून धर्म बदलेला नाही तसेच ज्यांनी धर्म बदलून बौद्ध धर्म स्विकारला आहे त्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे नियम लागू होतात (खालील पान नं २ नुसार दिले आहे)

पान नं २

महत्वाच्या सुचना :-

अ) अनुसुचित जातीचा दावा असल्यास १० अॉगस्ट १९५० पूर्वीच्या जातीचे पुरावे असणे आवश्यक आहे

आता येथे जसे अनुसुचित जातीच्या लोकांचेच १० अॉगष्ट १९५० पूर्वीचे जातीचे पुरावे मागितले आहे तसेच….. विमुक्त जाती / भटक्या जमाती २१ नोव्हेंबर १९६१ …… तसेच …….. इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग १३ अॉक्टोबर १९६७…. यांचाही त्या त्या तारखेनुसार पूर्वीच्या जातीचे पुरावे मागितले आहे.
कारण….

१) एखाद्या व्यक्तीचे पुर्वज खात्रीसाठी त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्या जातीचे आहेत कि नाही यासाठी.

बौद्धांसाठी अजून एक दुसरी गोष्ट:-
२) १० ऑगष्ट १९५० पूर्वीचे पुर्वजांची जात (महार किंवा इतर मागास) ‘जात पडताळणी प्रमाणपत्रा’च्या प्राप्तीसाठी धर्मांतरीत बौद्धांनी उल्लेख करावायचा आहे.

याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे:-

जातीचा दाखल्यावरील धर्म किंवा जातीचा उल्लेख:-
आता येथे काहीजण प्रश्न करतील कि:- जातीच्या दाखल्यावर पुर्वजांची जात लिहिलेली असते तर याबद्दल काय सांगाल? अश्यांसाठी खाली उत्तर आहे ती काळजीपूर्वक वाचावे नंतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये याची खात्रीसाठी पडताळणी करणे.

उत्तर :- जात पडताळणी अर्जात शेवटच्या पानावर महत्वाच्या सुचनाप्रमाणे:-

अ) अनुसुचित दावा असल्यास १० ऑगष्ट १९५० पुर्वीच्या जातीचे पुरावे असणे आवश्यक आहे.

याचा अर्थ १० ऑगष्ट १९५० पुर्वीचे जे आधीचे महार किंवा अन्य मागास जातींच्या लोकांनी १९५६ साली बाबासाहेबांसोबत बौद्ध धम्म स्विकारला…. त्यापूर्वी ते कोणत्या जातीचे होते…. हे समजण्यासाठीच फक्त त्याच लोकांनी जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्राप्तीसाठी पुर्वीची जात लिहिणे आवश्यक आहे.…. नाहीतर उच्च जातीचेही काही लबाड लोक सवलतीसाठी बौद्ध असल्याचा गैरफायदा घेऊ शकतात.…. परंतु जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या बौद्धांनी व त्यांच्या पुढील पिढीपासून कोणीही पूर्वीच्या जातीचा उल्लेख कुठल्याही बाबींसाठी करु नये…… जर तुम्ही बौद्ध धर्म लिहून महार जात लिहिलात तर महार जात म्हणूनच तुमच्या जातीच्या प्रमाणपत्रावर उल्लेख होणार…. हे चुकीचे आहे.

आता विचार करा….. महार / मांग हे हिंदू धर्मातील जाती आहेत…. तसेच बौद्ध धम्मात जात उपजात असा प्रकार नाही…. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म यासाठी स्विकारला कारण बौद्ध धम्मात जात उपजात हा प्रकार नाही म्हणून….. तर आपण पुन्हा तीच हिंदूमधील पुर्वजांची जात का लावावी?? म्हणजे हे असेच तुम्ही तुमच्या मुलांच्या / नातवंडांच्या कपाळी महार मांग या जातीचा शिक्का लावूनच ठेवणार आहे का?

 काही प्रश्न

१) जर मागच्या म्हणजेच हिंदू धर्मातील मागासवर्गीय जात लावायचीच होती तर मग आपण बौद्ध धम्माचा स्विकार का केलो??

२) जर तुम्ही बौद्ध धम्म स्विकारूनही हिंदूची जात लिहायची होती तर समजा तुम्ही मुसलमान, ख्रिश्चन, शीख, पारशी असे कोणताही धर्म स्विकारला असता तर तेव्हाही हिंदूची जात लावली असती का?

३) बौद्ध धम्म स्विकारूनही जर तुम्ही हिंदूची पुर्वजांची जात लावत असाल तर….. खालीलप्रमाणे लावणार का?
अ) बौद्ध + महार
आ) बौद्ध + हिंदू + महार

४) हेच बौद्ध धम्म स्विकारल्यानंतरही तुम्ही भविष्यकाळातील पिढ्यांपिढ्या तुमच्या मुलांना महार मांग अशी पुर्वजांची जात लिहायला सांगणार का? मग उपयोग काय तुम्ही बौद्ध धम्म स्विकरून?

५) बौद्धांनी धर्मांतरही करून पुर्वजांची जात लिहावे असे केंद्र किंवा राज्य सरकारचा तसा जीआर कोणता आहे?

६) जर केंद्र किंवा राज्य सरकारचा तसा बौद्धांनी पुर्वजांची जात लिहावी असा जीआर असेल तर….. (जे पुर्वजांची जात लिहा असे वारंवार प्रचार करीत आहेत) ते सरकारकडे आवाज का नाही उठवत? ते फक्त आपल्याच बौद्ध समाजातील जनतेला अंधारात ठेऊन पुन्हा तीच बौद्ध धम्म स्विकारल्यानंतरही पुर्वजांची हिंदूची जात का लिहिण्यास सांगत आहे?

७) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली धर्मांतर करताना आम्ही बौद्ध झालो असे जाहीर केले. त्यासाठी अत्यंत पराकाष्ठा केली मग तुम्ही पुन्हा तीच तुमच्या पुर्वजांची जात लिहून पाणी पेरणार का?

८) ज्या संघटना बौद्ध समाजाने जणगणनेच्या फॉर्ममध्ये पुर्वजांची जात लिहा असे सांगत आहेत तर त्यांच्याकडे सरकारमान्य काही माहिती आहे का?? असेल तर “सन २०२१” मध्ये होणाऱ्या ‘जनगणनेच्या विहित नमुन्यातील फॉर्म’मध्ये धर्मांतरीत बौध्दांनी, जर पूर्वाश्रमीच्या हिंदू धर्मातील “महार” या जातीचा उल्लेख करणे आवश्यकच असे म्हणणाऱ्यांनी तशा प्रकारचा विहित नमुन्यातील फॉर्म सादर करावा म्हणजे आपल्या म्हणण्याला साहजिकच एक भक्कम पुरावा समर्थनार्थ मिळू शकेल. तसे नसेल तर बौध्दांना संभ्रमित करण्याचे कृत्य तात्काळ थांबवावे. यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी सावध होऊन कर्तव्यबुध्दींनी सर्व बौद्ध समाजात जागृती निर्माण करावी.

हे जे प्रश्न आहे त्याचा तुम्ही विचार करा तसेच पुढे …. ज्या संघटना बौद्ध समाजाने जणगणनेच्या फॉर्ममध्ये पुर्वजांची जात लिहा असे सांगत आहे….. ते तुम्हाला मानसिक दबाव आणण्यासाठी दबाव टाकतील…. उदाहरणार्थ :- १) तुम्ही पुर्वजांची जात लिहित नसाल तर तुम्ही आंबेडकरद्रोही आहात, २) तुम्ही बौद्ध समाजाला आरक्षण मिळण्यास वंचित ठेवण्यास कारणीभूत आहात, ३) तुम्ही पुर्वजांची जात लिहून बाबासाहेबांचे संपुर्ण भारत बौद्धमय करेन हा संकल्प पुर्ण करावा.

विचार करण्यासारखी हि बाब आहे कि पुर्वजांची जात म्हणजेच हिंदूची जात लिहून संपुर्ण भारत बौद्धमय कसा काय होऊ शकतो?

४) या संघटना महार मार्शलचे उदाहरण देऊन बाबासाहेबांनी महारांचे कौतुक केले असे सांगून पुर्वजांची जात लिहिण्यास प्रवृत्त करतात….. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळात मागासवर्गीयांना लढवय्येची ताकद देण्यासाठी महारांनी जो विक्रम केला होता २८०० पेशव्यांना ५०० महारांनी मारले…. हे सांगून महारांना अन्यायाच्या विरोधात बळ दिले…. आणि आज तेच बाबासाहेबांनी जे महारांचे फक्त मानसिक बळ मिळण्यासाठी कौतुक केले तेच हे जे पुर्वजांची जात लिहायला सांगणारे त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करीत आहेत…. जर हिंदू धर्मातील महार जात बाबासाहेबांना इतकीच प्रिय होती तर त्यांनी हिंदू धर्मासकट महार जात का सोडली?? मग का नाही त्यांनी बौद्ध महार आहोत म्हणून तेव्हा घोषित केले?

५) जे पुर्वजांची जात लिहायला सांगतात त्यांचे मत आहे. ” स्पर्धापरीक्षांमध्ये UPSC / MPSC / STAF CELECTION / ETC…. बौद्धांना जागा कमी मिळते कारण जणगणनेत बौद्धांनी महार म्हणजेच पुर्वजांची जात लिहिली नाही म्हणून आरक्षणांची घट होते” ….. जर खरच सरकारी जागेत बौद्धांना जागा मिळत नसेल तर ती सरकारची चुक आहे. सामान्य जनतेची चुक नाही. म्हणून बौद्ध धम्म स्विकारलेल्या जनतेकडून पुन्हा त्यांच्या पुर्वजांची जात लिहू नये.

बौद्ध धम्मात जाती उपजाती नाही असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. ” मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही” असे भाषण केले होते याचा अर्थ काय? तर आता बौद्ध धम्मांतरानंतर ते किंवा ज्यांनी बौद्ध धम्म स्विकारला ते हिंदू नाही मग का बौद्धांनी पुर्वजांची जात लावावी?

बौद्ध धम्मात देवीदेवतांना स्थान नाही…. पुजाअर्चा.. उपवास.. कर्मकांड.. नीच रुढी, परंपरा, प्रथा या अंधश्रद्धा मानली जात नाही…. ज्यांनी बौद्ध धम्माचा संपुर्ण अभ्यास केला असेल किंवा बाबासाहेबांचे विचार वाचले असतील त्यांना हे नक्कीच माहिती असणार…. सांगायचा उद्देश हाच कि लोकांना ते बौद्ध आहेत तर बौद्ध धम्म म्हणजे काय हे पटवून सांगितले तर ते ही या अंधश्रद्धा मानणार नाही आणि ते खरे बौद्ध होतील….. पण जर त्यांना हे सांगितले कि…. ते बौद्ध आहेत पण त्यांची जात महार आहेत…. तर ते शक्यतो बौद्ध असूनही हिंदू महार जातीप्रमाणे देवीदेवतांची पुजाअर्चा करून…. रुढी परंपरा प्रथा पाळून अंधश्रद्धेत राहतील…. आणि नेमके हेच बाबासाहेबांना नको आहे.. त्यांनी बौद्ध असून महार लिहिले तर त्यांची मानसिकता त्यांना महारच ठेवणार…. असे कितीतरी काही बौद्ध आहेत जे फक्त बौद्ध लिहूनही अंधश्रद्धा पाळतात कारण त्यांनीही कधी बाबासाहेबांची पुस्तके वाचलीच नाहीत…. म्हणून त्यांना वैचारिकदृष्ट्या बौद्ध बनविण्यासाठी…. त्यांना पहिल्यांदा ते बौद्ध आहेत…. आता ते हिंदू महार नाहीत हे त्यांच्या मनात हि सच्चाई बिंबवली पाहिजे….. तर तेव्हा ते स्वतःला स्वतःचा मेंदू शाबीत ठेवून मानसिकदृष्ट्या बौद्ध समजतील…… त्यासाठी बौद्ध समाजातील प्रत्येकांनी बौद्ध धर्म आणि जात…… काहीच नाही असेच लिहिले पाहिजे..

जे लोक बौद्ध समाजाला बौद्ध धम्म लिहिल्यानंतर पुर्वजांची महार जात लिहा असे सांगत आहे…. ते तर पुन्हा बौद्ध समाजात नव्याने महार जात चुकीच्या अज्ञानामुळे आणत आहेत असेच दिसते…. त्यांच्यासाठी खासकरून बाबासाहेबांनी जे खालील दिलेले वाक्य आहे ते तंतोतंत जुळते….. “महारांनी एवढा चांगला बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याला बाटवला”

डॉ. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेच्या प्रसंगी आपल्या सविस्तर भाषणामध्ये म्हटले होते.