महाकारुणीक तथागत गौतम बुद्धांनी अनेक माध्यमातुन घोर तपश्चर्या करुन ज्ञानाची प्राप्ती केली. ज्ञान प्राप्ती नंतर त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. बुद्ध म्हणजे कोणतेही नाव किंवा उपाधी नसुन तथागतांना प्राप्त झालेले सम्यक ज्ञान होय, निरंतर वाहणारा ज्ञानाचा झरा, त्यांच्या गुणांचे स्मरण म्हणजेच तथागतांनी हस्तगत केलेले धम्म ज्ञान. बुद्धांचा धम्म म्हणजे मानवांनी मानवांशी, प्राणीमात्रांशी तसेच निसर्गाशी आपले वागणे,आचरण असे असावे जेणे करुन मानवांचे व प्राणिमात्रांचे जीवन सुव्यवस्थीत चालेल. त्या साठी तथागतांनी धम्मवाणी नियमबद्ध स्वरुपाने आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्या करीता तर्कशुद्ध सिद्धांतावर वैज्ञानिक दृष्टया आधारीत अंधश्रद्धा मुक्त असा साधा सोपा धर्म आम्हाला बुद्धांनी दिलेला आहे, या मार्फत जनहित साधणे सोपे होईल. त्या पैकी आत्मा एक अंधश्रद्धेचे उगम स्थान……
भारी मोठ्या प्रमाणात हे माध्यम अंधश्रद्धेचे प्रेरणास्त्रोत होय असे म्हणायला हरकत नाही…..
जो धर्म आत्म्यावर आधारलेला आहे तो कल्पनाश्रीत धर्म होय. आत्मा कुणी ही पाहिलेला नाही किंवा संवादही साधलेला नाही. तर तो अज्ञात आणि अदृष्य आहे अशी संकल्पना मांडल्या गेली आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती आत्मा नसुन मन किंवा चित्त होय. आत्मा आहे यावर विश्वास ठेवणे योग्य नाही किंवा असा कोणताही धर्म स्विकारु नये जो फक्त भ्रामक समजुतींचा जनक आहे यावर तथागतांची भरपुर सांगता आहे. यावर विश्वास ठेवणे म्हणजे ब्राम्हणी धर्म अंगिकारणे……
ब्राम्हणी धर्मात जीवाला आत्मा असे संबोधतात. ब्राम्हणी धर्मात आत्मा म्हणजे हे त्या तत्वविशेषाला देण्यात आलेलं नाव म्हणजे शरीरा पासुन अलिप्त परंतु शरीराच्या आत जन्मा पासूनच वास्तव्य करीत असतो. शरीरा सोबत त्याचा मृत्यु होत नसतो तर दुसर्या जन्माच्या क्षणी त्या शरीरा सोबत जन्म घेतो असा काल्पनिक दृष्टीकोण जन्माला आला. यावर तथागतांचा विश्वास नाही. तथागतांचा सिद्धांत म्हणजे अनात्मवाद. आत्म्याचे अस्थित्व मानले तर अनेक प्रश्न उद्भभवतात…… आणि ते म्हणजे आत्म्याचा स्वरुप कसा, आकार कसा, कुठुन आला, कुठे गेला ..अशी अनेक प्रश्न उद्भभवतात. आत्म्याची संकल्पना अस्पष्ट आहे …हे तथागतांनी तर्कशुद्ध पद्धतीने स्पष्ट केले…
आत्म्या वर विश्वास ठेवणार्यांनी अनेक संकल्पना मांडल्या , यावर केलेली चर्चा निरर्थक आहे. आत्म्याच्या अस्तित्वा वरील विश्वास म्हणजे महाभयंकर बाब आहे. त्या विश्वासातुन पुरोहित वर्ग निर्माण होवुन भ्रामक समजुती ही निर्माण होतात आणि पुढे माणसाच्या जन्मा पासुन तर शेवट पर्यंत तो अधिकार पुरोहिताला बहाल करतात. तथागत म्हणतात आत्मा नावाची कोणती ही वस्तु नाही म्हणुन त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद म्हणतात. सर्वसाधारण विचारसरणी पेक्षा ही तथागतांनी खास अशी विचारसरणी मांडलेली आहे. तसेच त्यांनी स्वतःचा नामरुप सिद्धांत मांडला. नामरुप म्हणजे प्राण्यांची सामुहिक संज्ञा…..
तथागता़च्या मते मानव प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम होय. हे भौतिक आणि मानसिक तत्व म्हणजे स्कंध . रुप स्कंध हे पृथ्वी, जल ,अग्नि आणि वायु या चार भौतिक तत्वांचे बनलेले असते. ही तत्वे म्हणजे रुप किंवा शरीराचे घटक. रुप स्कंध आणि नाम स्कंधाचे मिश्रण म्हणजे प्राण्यांची रचना….. हे नाम स्कंध म्हणजे विज्ञान किंवा चेतना. त्यातील तिन मानसिक घटक तत्वे होत १) वेदना :- सहा इंद्रियांच्या सृष्टीतील त्यांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्याने होणारी अनुभुती …
२) संज्ञा ३) संखार (संस्कार) मनाच्या भिन्न भिन्न अवस्था, पृथ्वी, जल , तेज आणि वायु या चार तत्वांचा प्रकृतीच्या नियमा नुसार होणार्या योग्य संमिश्रणाने आणि योग्य परिस्थीती मध्ये विज्ञान स्वतःच उत्पन्न होतो. या विज्ञानाची उत्पत्ती जन्मा पासुन होवुन मर्णोपरांत विनाश पावते. त्या विषयी बुद्ध म्हणतात जेथे शरीर अथवा रुप काया आहे तेथे त्यांच्यासह नाम काया ही वहात असते. वैज्ञानिक उदाहरण म्हणजे जेथे नवे विद्युत क्षेत्र असते तेथे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारांनी अस्तित्वात येते हे कुणाला ही ज्ञात नसते, परंतु जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे नेहमीच विद्युत क्षेत्रा बरोबर असते. शरीर आणि विज्ञान किंवा चित्त या मध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे.
तथागतांनी आत्म्या विरुद्ध पुन्हा काही महत्व पुर्ण तर्क दिलेले आहेत. जेव्हा वैज्ञानिक दृष्ट्या चित्ताचा किंवा चेतनेचा उदय होतो तेव्हाच मनुष्य जीवीत प्राणी बनतो म्हणुनच विज्ञान ही माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तु आहे. विज्ञान क्रियाशिल आहे. त्या मार्फत ऐखादी माहिती प्राप्त होणे म्हणजे ज्ञानसुचक असते. मग ती आवडणारी असो वा नावडणारी. चित्ताच्या सुखकर आणि दुखकर लक्षणांनी युक्त अशा विज्ञानाला भवना मुलक म्हणतात. हे विज्ञान वेदनांची निर्मिती करते. विज्ञान माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्याची प्रेरणा देते. क्रियाशिल विज्ञान म्हणजे संकल्पाचे जनक . ह्रया वरुन असे स्पष्ट होते की एक प्राणी जेवढी क्रिया करतो ती सर्व विज्ञानाच्या द्वारा त्याचा परिणाम म्हणुन करतो. मग आत्म्याने करायची सर्व कामे विज्ञाना द्वारे पुर्ण केली जातात मग या विश्लेषणा नंतर आत्म्याचे कोणते कार्य शिल्लक राहते असा तथागतांचा प्रश्न आहे. ज्याचे काही कार्यच नाही असा आत्मा म्हणजे तर्कविसंगतच होय. म्हणजेच मुर्खपणा….. या पद्धतीने तथागतांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले. म्हणुनच आत्म्याच्या अस्तित्वास अ-धम्म म्हणतात…..
बुद्ध आणि त्यांचा धम्मातील सार
अर्चना नरेंद्र चव्हाण
आत्मा :- एक संकल्पना

More Stories
🪷 तथागत भगवान बुद्ध, योग आणि विपश्यना : आत्मशुद्धीचा खरा मार्ग 🪷
बुद्ध धम्म (बौद्ध धर्म) हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे Buddha Dhamma (Buddhism) is the path to liberation from suffering.
गौतम बुद्धांचे 10 प्रेरणादायी विचार 10 Inspirational Thoughts of Gautama Buddha