महाबोधी सोसायटीने आयोजित केलेले, नवी दिल्ली येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ५ फेब्रुवारी १९५६ रोजी केलेले भाषण…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
कम्युनिझमला उत्तर देऊ शकत नाही असा कोणताही धर्म अस्तित्त्वात रहाणार नाही. माझ्या मते कम्युनिझमचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा केवळ बुद्ध धर्मच आहे.
जे लोक सर्व धर्मावर विश्वास ठेवतात आणि प्रत्येक धर्मातून थोडेफार निवडून उचलतात त्यांच्याशी माझे सहमत नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती भारतात निदर्शनास येते. प्रत्येकाने आपापली निवड करावी आणि तिच्यावर विसंबून रहावे.
प्रत्येक धर्म दुसऱ्याहून भिन्न असण्याचीच शक्यता आहे. बुद्ध धर्माने उपदेशिलेली अहिंसा आणि जैन धर्माने उपदेशिलेली अहिंसा यात महदंतर आहे. जैन धर्माने अहिंसेला अतिरेकास नेऊन पोहोचविले.
***
संकलन — आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे.
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर