June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धांनी सांगितलेला जीवनाचा मध्यम मार्ग 

जीवनाचा मध्यम मार्ग The Middle Way of Life as taught by the Buddha

दिव्यत्व प्राप्तीनंतर उर्वरीत आयुष्य बुध्दाने धम्माची शिकवण सांगण्यासाठी खर्च केले. त्यांच्या शिकवणूकीस बुध्दधम्म म्हणतात. आज आशियायी राष्ट्रामध्ये बुद्धधम्म हा प्रमुख धर्म म्हणून बऱ्याच ठिकाणी आहे. बुध्दधम्मात अष्टांगिक मार्ग म्हणजे जीवनमार्ग होय. हा धम्ममार्ग सामान्याच्या विचारांना विशिष्ट धार देणारा धम्म आहे. अयोग्य व. हानिकारक विचारांना थांबविणारा मार्ग आहे. मध्यम मार्गाचा स्विकार केल्याने, अंगीकृत केल्याने, आचरण केल्याने, दुःख निरोध होते, मध्यम मार्गाच्या अंगीकृतपणामुळे आपण निश्चित ध्येय गाठू शकतो, जीवनाचा खरा आनंद प्राप्त करु शकतो. निर्वाण प्राप्त करू शकतो.

🌼 १. सम्यक दृष्टी

कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा प्रश्नांची उकल करण्यापूर्वी आपले मन प्रथम स्वच्छ, स्पष्ट असावे. नंतरच तो प्रश्न इतर प्रश्नापासून अलग करुन त्याचे सत्यस्वरुप पडताळून त्याप्रश्नामागील कारणे शोधली पाहिजेत आणि सम्यक दृष्टी ही कृतीपूर्व अवस्था होय है मार्गक्रमण करण्यापूर्वी जीवनाशी निगडीत असलेल्या तीन वैशिष्ट्याविषयी प्रथम विचार केला पाहिजे. ते म्हणजे अनिच्च लक्षण, दुःख लक्षण व अनात्म लक्षण मानवी जीवनाविषयी. मूल्यांविषयी, अस्तित्वाविषयी व सजीवातील घटकाविषयी ज्यांच्यामुळे जन्म मृत्यूचे चक्र चालू आहे त्या घटकाविषयी आपली स्पष्ट संकल्पना असावी,

🌼 २. सम्यक संकल्प

आपले मन कोणतीही कृती करण्यापूर्वी स्पष्ट व स्वच्छ असावे, ते शुध्द असावे. ते अपकारक व बाधक विचारापासून मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करतांना मन मुक्त असावे उच्चस्तरांवरून विचार केल्यास आपले मन संवेदनापासून, विकृतइच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता व आळस या सर्वांपासून मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्ताद्वारे साध्य होईल. त्याच बरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर ध्यान साधने मधूनच मात करू शकतो.

🌼 ३. सम्यक वाचा

ध्यान धारणेपूर्वी आपले मन, मिथ्य विचार, चहाडी, कठोर शब्द, निरर्थक गप्पा यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण विचार व कृति यामध्ये एकाग्रता निर्माण करू शकतो. या वैशिष्ट्याला ज्ञान आणि कल्पकतेची जोड आहे. सम्यक वाचा म्हणजे पूर्ण गोड शब्दाचे बोलणे असावे. वाणी गैरशिस्त व भावनाप्रधान नसावी, सम्यक वाचा ही मन कलुषीत करणारी विकृत विचारांची, स्वार्थी नसावी. सम्यक वाचा ही असंयमी व भावनाप्रधान नसावी. सम्यक वाचा ही प्रेमळ व सत्य असावी. ती प्रसंगानुरूप योग्य असावी. ऐकणाऱ्यांसाठी व समाजासाठी सुध्दा.

🌼 ४. सम्यक कृती

साधारणतः सम्यक कृती ही पंचशीलावर आधारित आहे. ही बुध्दधम्माची प्राथमिक तत्वे आहेत. त्यांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

१) हत्त्या न करणे, प्राणीमात्रावर दया करणे.

२) कांही न स्विकारणे (अपरिगृह ) परोपकार व औदार्य आचरणात आणणे.

३) संवेदनाचा गैरवाप नसावा, शुध्द आचरण व आत्म संयम असावे.

४) असत्य व कठोर वाचा याचा उपयोग करू नये, प्रामाणिकपणा, सचोटी व वक्तव्यापूर्वी वैचारिकता यांचे आचरण असावे.

५) मद्यपान करू नये जे अनियंत्रित वर्तनास प्रेरित करते. आत्मसंयमन व विचारपूर्वक आचरण असावे.

उच्च जीवनमानासाठी या पांच तत्वांचे आचरण आवश्यक आहे. जो याप्रमाणे मार्गक्रमण करेल, कृती करेल. तो इतरांनाही त्रासदायक नाही व स्वतःसाठी सुध्दा….

🌼 ५. सम्यक आजिविका

सम्यक आजिविका ज्या व्यवसायापासून समाजाला उपद्रव होणार नाही अशा घटका संबंधीत आहे. उपद्रवी व्यवहार पाच प्रकारचे आहेत. ते सामान्य व्यक्तीनी टाळले पाहिजेत शस्त्राचा व्यापार, जे व्यक्तीला कमीपणा प्राप्त करून देतात असे व्यवहार, मद्य व्यवहार विषारी घटकाचा व्यवहार व्यक्तीने टाळावेत आणि पैसे व्याजाने देऊन जास्त मिळकत प्राप्त करणेसुद्धा टाळावे. या आधुनिक जगात स्वतः च्या व्यवसायाची निवड करतांना स्वतःचा विचार लागतो. व योग्य व्यवसाय निवडावा लागतो.

वरील प्रकारचे समाजपद्रवी व्यवसाय वृध्दधम्मामध्ये निषेध मानले जातात. बॊध्द व्यक्तीने ह्यासर्व बाबींचा विचार करुनच आपला योग्य व्यवसाय निवडावा. त्यामध्ये समाजाला हानिकारक असणाऱ्या व्यवसायाचा समावेश असू नये. सम्यक आजिविका अष्टांगिक मार्गाची पाचवी पायरी होय.

🌼 ६. सम्यक व्यायाम

चांगला व हुशार विद्यार्थी प्रत्येकाने झाले पाहिजे म्हणजे सम्यक व्यायाम होय. प्रत्येकाचे सतत चांगले प्रयत्न असावेत. अपकारक किंवा बाधक वर्तन सर्वांनी टाळावे. सम्यक व्यायामविषयी खालील चार बाबी महत्वाच्या आहेत.

१) मनात निर्माण झालेला अपकारक तथा बाधक व्यायाम प्रथम काढून टाकावा.

२) मनात अपकारक तथा बाधक व्यायाम उद्भवत असल्यास उद्भवू देऊ नये.

३) मनात उपयुक्त सम्यक व्यायाम विकाशीत करावा.

४) मनात उपयुक्त सम्यक व्यायाम उद्भवत असल्यास त्याचा विकास करावा.

जर धम्म शिकवणूकीविषयी वर्ग चालू असतील तर अशा ठीकाणी जातीने प्रवेश घेऊन धम्म आत्मसात करावा. तेथे सांगितलेली सर्व कामे करावित.

🌼 ७. सम्यक स्मृती

सम्यक स्मृती म्हणजे जागृतपणाचा विकास करणे. त्यामुळे धार्मिक प्रगती साधली जाते. थोडक्यात स्पष्ट करता येईल की, मन सम्यक स्मृतीमुळे असे तयार होईल की ते अपकारक तथा बाधक बाबी कोणत्या ते सहज ओळखू शकते. आपण जे काही करू है सम्यक स्मृती ठेवूनच करु त्यावेळी पूर्णपणे त्याच गोष्टीकडे लक्ष दिलेले असेल. अभ्यास करतांना एकाच बाबीवर जर स्मृती असेल तरच अभ्यासांती चांगले परिणाम प्राप्त होतील.

जर आपण कोणतेही काम स्मृती ठेवून केले तर तुम्ही चांगले काम करणार व चूकांना त्याठीकाणी वाव राहणार नाही. कोणत्याही कामासाठी स्मृती ही अत्यंत महत्वाची आहे. उच्चस्तरांवर ध्यान भावना करणाऱ्याना सम्यक स्मृती व मन ह्याविषयी विशेष ज्ञान असते, ध्यानभावनेशी सम्यक स्मृतीचा जवळचा संबंध आहे. स्मृती कधी कधी चूकीची असू शकते, फसवणूक करणे, चोरी करणे ह्यासाठी सुध्दा स्मृती आवश्यक आहे परंतु ती सम्यक स्मृती होत नाही. मन हे सतत चांगले असावे.

🌼 ८. सम्यक समाधी

सम्यक समाधी ही अष्टांगिक मार्गची शेवटची पायरी आहे. ही मध्यम जीवनमार्गाची एक पायरी आहे. ती मनाविषयी केंद्रीत झालेली आहे. सम्यक समाधी म्हणजे ध्यान भावनेचा सराव होय. जो आपणास पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मार्गदर्शक आहे. अनिच्च लक्ष व निव्वाणविषयी मार्गदर्शक आहे.

साध्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सम्यक समाधी व्यक्तीला मन केंद्रीत करण्यास उपयुक्त आहे. उदा. जर आपणास एखादी गोष्ट करावयाची आहे त्यापूर्वी आपण एकाग्रता करावी, मनाची एकाग्रता वाढवावी. वाचन, लेखन किंवा कोणतेही काम करण्यापूर्वी एकाग्रता ही आवश्यक आहे. त्याचे परिणाम चांगले प्राप्त होतात. एकाग्रता सराव हा पुन्हा पुन्हा करणे आवश्यक आहे.

अष्टांगिक मार्ग तीन स्तरावर विभागता येतील.

१) शीलस्तर, सम्यक वाचा, सम्यक कृती व सम्यक आजिविका है शीलाशी संबंधीत आहेत.

२) समाधीस्तर – सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती, समाधी स्तराशी निगडीत आहेत. ज्यांना मनाला उच्चस्तरावर प्रशिक्षित करावयाचे आहे. त्यांच्याकरीता हा समाधीस्तर होय.

३) प्रज्ञास्तर – सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प प्रज्ञा स्तराशी निगडीत आहेत.

सामान्य जनतेस धम्मविषयक प्रशिक्षण देणारा हा प्रज्ञास्तर आहे. हा दुसऱ्या स्तराची फलश्रुती होय. कोणतीही कृती करण्यापूर्वी प्रथम ती पूर्णपणे जाणून घेतली पाहिजे. कृती करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी आपले मन त्याकृती विषयी संपूर्ण ज्ञात असले पाहिजे. अष्टांगिक मार्ग कोणत्याही कृतीसाठी लागू पडतो. ही बुध्दधम्मातील शास्त्रीयपध्दती मनाचा विकास करणारी आहे.