सण व्रत याची जबाबदारी महिलांवरच का? याचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. काळानुसार काही बाबी कालबाह्य व्हायला हव्यात.
धर्म
सर्व धर्म हे पुरुष निर्मित आहेत त्यामुळे स्त्रियांच्या फायद्याच्या- सोयीच्या दृष्टिकोनातून कोणतेही प्रथा परंपरा व्रत-वैकल्याची निर्मिती करण्यात आली नाही.
पितृसत्ता/पुरुष सत्ता
भारतात मोठ्या प्रमाणात पुरुष प्रधान व्यवस्था कार्यरत आहे आणि अत्यंत चालाखीने पुरुषप्रधान संस्कृतीची वाहक महिलांना बनवण्यात आले आहे .
अंधानुकरण
वर्ग विभाजना प्रमाणे उच्चवर्गीयांचे निम्नवर्गीयांकडुन अंधानुकरण केले जाते. उच्चवर्गीय कोणत्या जातीचे धर्माचे आहेत याकडे दुर्लक्षुन चालता येणार नाही. ते कोणत्या विचारधारेचे आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. अंधानुकरण चुकिचेच.
मिडीया
चित्रपट टीव्ही सिरीयल व सोशल मीडियाच्या माध्यमातून सणवार व्रतवैकल्ये यांचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो. हम दिल दे चुके सनम मध्ये ऐश्वर्या राय सलमान खान साठी व्रत पकडते. तर त्या ,सिनेमाचे अनुकरण करून आमच्या महिला ही करवाचौथ चे व्रत पकडतात.
साजशृंगार
नटने -थटने -सजने हा बाजार वादाने लादलेला पण बायांचा आवडता प्रांत. म्हणून बाया दोन दिवस का होईना आपल्याला नटाला -थटायला- सजायला मिळते म्हणून कोणतेही चिकित्सा न करता सण व्रत साजरे करतात.पारंपारिक वेशभूषेत संस्कृती टिकवण्यासाठी हे केले जाते असा समज निर्माण झाला असते म्हणून घरातही या खर्चाला पितृसत्ते कडून ही फारसा विरोध केला जात नाही.
बाजार वाद
महाराष्ट्र टाईम्सने नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या घालून आपल्या वर्तमानपत्रात मार्केटिंग केले पण आता ते परंपरा म्हणून पुढे येतोय.
बाजार वाद हा आपल्या उत्पन्नासाठी सन व्रतवैकल्यांचा अधिक प्रचार व प्रसार करून नफा कमवन्यात यशस्वी होतो.
श्रमाचे दुहेरी ओझे
भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये आधीच बायांवर घरातील सर्व कामाचा भार असतो. त्यात सण वार व्रता च्या दिवशी आणखीन दुहेरी काम महिलांच्या वाट्याला येते प्रत्येक सणावाराच्या विशेष असा फराळ असतो .तो फराळ बनवणे घराची रंगरंगोटी करणे. सडा-सारवण करणे. हार -फुले तयार करणे. सुशोभिकरण करणे. पाहुण्यांचे आवभगत करणे.अशा अनेक दृश्य आणि अदृश्य श्रमाचे दुहेरी ओझे महिलांवर येते.
महिलांना गुलामीत गुंतवून ठेवण्यासाठी. उपास-तापास व अडकविले जाते. त्या आपल्या अधिकारांबद्दल जागृत होऊ नये व नेहमीच दुय्यम आणि कमजोर रहाव्यात म्हणून हे षड्यंत्र रचलेले आहे.
आरोग्य
व्रतवैकल्ये यांचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम पडतो. उपास-तापास पकडणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचे बीपी लो होणें,अॅनिमीक होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, कॅल्शियम कमी होणे, असे प्रकार घडतात.
त्याच प्रमाणे व्रतवैकल्यं साठी महिला मासिक पाळी टाळावी म्हणून गोळ्या घेतात. कारण काय तर मासिक पाळी असताना पूजा केलेली चालत नाही अशी अंधश्रद्धा आहे. आणि मग पाळी आलेल्या महिलेला पूजा करता येत नाही व त्या दिवशी मिरवता येत नाही तिला अघोषित अस्पृश्य ठरविले जाते. म्हणून मग महिला डॉक्टर कडे जाऊन मासिक पाळी समोर मागे करतात व आपले शारीरिक हेळसांड करतात. आधीच अनेक महिलांना मासिक पाळी मध्ये त्रास होतो किंवा अबॉर्शन सारखे प्रसंग आलेले असतात त्यामुळे शरीर कमकुवत झालेले असते त्यात एक भर पडते. करवाचौथ च्या दिवशी बाया दिवसभर बिना पाण्याने बिना अन्नाने न राहतात तर छटच्या दिवशी पूर्ण दिवसभर त्या काही खात नाही व रात्रीही काही खात नाही. आणि हे सर्व व्रत-वैकल्ये ते घरातील पुरुषाचे आरोग्य व आयुष्य वाढवण्यासाठी करत असल्याचा समज करून घेतात. मग असे सण व्रत वैकल्य पुरुष का करत नाहीत?तसंही बाईच्या जीवाला फारसे महत्त्व नाही आज मेली तर उद्या दुसरी केली असे समाजात दिसून येते.
मानसिक आरोग्य
व्रतवैकल्ये केल्याने महिलांच्या वैज्ञानिक, तार्किक दृष्टिकोनाचा विकास होत नाही .उलट या देव भोळ्या होतात. मानसिक समस्या निर्माण झाल्या तरी बाबा बुवा कडे जातात डॉक्टर कडे जात नाही. मग बाबा बुवा वत्यांचे शोषण करतात व मानसिक रोग उपचाराअभावी आणखीनच वाढत जातात. बाबा-बुवा कडे जाणाऱ्या महिलांचे प्रमाण फार जास्त आहे. बाबा राम रहीम व आसाराम बापू यांच्यासारखे अनेक बाबा निर्माण होतात व अनेक महिला त्यांचे भक्त बनतात.
शारीरिक शोषण
बाबा बुवा धर्माची तर कधी जादूटोण्याचे भीती दाखवून शारीरिक शोषण करतात .राम रहीम आसाराम बापू त्यांचे उदाहरणे आहेत. आपल्याला माहित असलेले व माहीत नसलेले अनेक बाबा बुवा गल्लोगल्ली कार्यरत आहेत आहेत.
आर्थिक शोषण
पुरुष बाबा -बुवा बनतात कशासाठी? कमाई करण्यासाठी. कमाई करण्याचा करिअर म्हणून सर्वात सोपा मार्ग हा आहे. वाकचातुर्याने
भोळ्या लोकांना फसवणूक व त्यांचे आर्थिक शोषण करणे. समस्यांचे निवारण करतो म्हणून पैसे घेणे. या पूजेला इतके रुपये लागतील त्या पूजेला तितके रुपये लागतील. ह्या देवाला ईतका चढावा लागेल .त्या देवाला ते चढावा लागेल. असे सांगून लूटले जाते. बाबा-बुवा स्वतः च्या समस्या पाई बाबा -बुवाव बनलेले असतात. ते काय इतरांच्या समस्याचे निर्वारण करतील.
झालेली फसवणूक काहींच्या लक्षात जरी आले तरीही ते आपण अशाप्रकारे लुबाडले गेलो आहोत हे जग जाहीर सांगत नाही कारण यात त्यांची चुकी असते.
यातून पैशासाठी होणार गुन्हे, आत्महत्या अशा प्रकारची गुन्हेगारी वाढीस लागते.
सण व्रत करण्यासाठी कर्जबाजारी होऊन कपडे घेणे ,द्मूर्ती घेण्यासाठी त्यांच्या सुशोभीकरण करण्यासाठी पैसे खर्च करणे . अमुक अमुक होऊ दे मी तुला हे वाहीन. मी तुला ते वाहिन. इतके लोकांना जेवण घालेल. तितके लोकांना जेवण घालेल .अशी बोलणी करून ते पूर्ण करणे .यांच्यातही गरीबांचे बरेच आर्थिक नुकसान होते.
भारतीय समाज उत्सवप्रिय देश आहे. म्हणून नाही का कोरोनाचा देखील उत्सव थाळ्या व टाळ्या वाजून करण्यात आला. उत्सव करताना चिकित्सक दृष्टी करून ठेवून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही .शारीरिक व आर्थिक नुकसान होणार नाही. याची काळजी घेऊन उत्सव करणे करणे कधीही चांगले.
प्रा.प्रज्ञा मेश्राम , नागपुर.
9423402412
More Stories
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी चेअरमन डॉ.चंद्रबोधि जी पाटील यांच्या शिखर संस्थेचा नाशिक जिल्हा शाखेची बैठक त्रिरत्न बुद्ध विहार सातपुर येथे पार पडली
अशोका वॉरियर्स आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडाने बुद्ध लेणीचे संवर्धन
Tashi Dolma didi ज्येष्ठ धम्म प्रचारक ताशी डोल्मा यांचे निधन