June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

संघठन ही शक्ती आहे

तथागत बुद्धाचा वज्जी लोकांना संदेश

वज्जी लोकांचे वैशाली गणराज्य होते मगध राजा अजातशत्रू अनेक प्रयत्न करूनही ते जिंकू शकत नव्हता. प्रत्येक वेळी ते वज्जी लोक अजातशत्रू चा हल्ला परतून लावत होते. वैशाली हे भगवान बुद्धांचे आवडते ठिकाण होते अनेक उपदेश त्यांनी वैशालीत केलेले आहेत. अजातशत्रू ला कोणत्याही परिस्थितीत वज्जी गणाला जिंकायचे होते. त्याने आपल्या राज्यात काही तज्ञांचे मत जाणून घेतले. त्यात असा निर्णय झाला की हे वज्जी लोक बुद्ध धम्माचे आणि विचारांनुसार अनुसरण करणारे प्रामाणिक उपासक आहेत. ते भगवान बुद्धांच्या उपदेशाची अंमलबजावणी करतात. म्हणून वैशाली येथे *वर्षाकार ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भगवान बुद्धांकडे पाठवण्यात आले. * त्यांनी भगवान बुद्धांची कुशल चौकशी केली अजातशत्रू राजाने अभिवादन केले असल्याचे सांगितले. अजातशत्रू राजाने आपल्याला विनंती केली आहे की वज्जींचा पराभव कसा करता येईल. त्यांची एकजूट कशी तोडता येईल कारण भगवान बुद्ध खोटे बोलत नसतात.

तथागत भगवान बुद्ध त्यांना उत्तर न देता भंते आनंद यांना प्रश्न विचारतात, काय वज्जी मी दिलेल्या संघ नियमांचे पालन करतात का ? 

आनंद  : कोणते नियम भगवंत

1) काय वज्जी नियोजीत ठिकाणी एकत्र येतात ?

आनंद : होय भगवंत !

2) काय वज्जी वडीलधारी मंडळी व नारींचा मान सन्मान
करतात ?

 आनंद : होय भगवंत !

3) काय वज्जी एकत्र येऊन चर्चा करतात ? आनंद होय भगवंत !

4)  काय वज्जी एकमताने निर्णय घेतात ?

आनंद  होय भगवंत !

5) काय वज्जी एकमेकांच्या संपर्कात आनंदाने एकता बंधुता ने एकत्र राहतात ?

आनंद : होय भगवंत !

6) काय वज्जी बहुमताने घेतलेले निर्णय एकमताने अमलात आणतात ?

आनंद :होय भगवंत !

7)  काय वज्जी धम्मानुसार आचरण करतात ?

आनंद : होय भगवंत ! राहिल. त्यांचा पराभव सहज होऊ शकत नाही.

वर्षाकार ब्राह्मणाने भगवान बुद्धाचा निरोप घेतला व सर्व हकीकत राजा अजातशत्रू स सांगितली. त्यानंतर  अजातशत्रू

तथागत म्हणतात, आनंद जोपर्यंत वज्जी लोक असे आचरण करतील तो पर्यंत ते अपराजित राहतील. त्यांची प्रगती होत हे रहस्य वर्षाकार ब्राह्मणाने जाणून घेतले व अभिवादन करून आणि वर्षाकार ब्राम्हण यांनी वज्जी ची एक संघता तोडण्यासाठी एक योजना बनवली* अजातशत्रू राज्याच्या दरबारी वज्जी लोकांचे बाजूने बोलत असल्याने अजातशत्रू राजाने आपल्या दरबारात वर्षाकार ब्राह्मण यास आपल्या राज्यातून हद्दपार केले. ही बातमी वज्जी लोकांचे कडे पोहोचली. कांहीनी सांगितले की वर्षाकार ब्राह्मण हा कपटी आहे त्याच्या नादी लागू नये. कांही ने सांगितले की आपल्या राज्याच्या बाजूने बोलत असल्याने त्याला आपला देश सोडून जावे लागते आहे. म्हणून आपण आपल्या राज्यात त्याला आसरा दयावा. वडील वयस्कर व्यक्तींनी वर्षाकार ब्राह्मणाच्या कपटीपणाला बळी पडू नका असे बजावले. पण तरूणांनी ठरवले की जर आपली बाजू घेण्यावर अन्याय होत असेल तर आपण त्याला सहकार्य करावे. जेष्ठ लोकांना च्या सल्ला डावलून त्याला वैशाली नगरात प्रवेश दिला. त्याला थोडे दिवसातच लोकप्रियता लाभली. अजातशत्रू कडे तो सेनापती होता तर त्याचे कामाचे स्वरूप बघून त्याला वज्जी लोकांनी त्याला वैशाली नगर चा ही प्रधानसेनापती पदावर नियुक्ती केली.

विश्वास संपादन झाल्यावर वर्षाकार ब्राम्हणाने आपले काम सुरू केले.

1) तो मित्रांमधील एकाला बाजूच बोलवून कानात विचारायचा आज काय जेवला आहेस. मित्र त्याला विचारत वर्षाकार ब्राह्मणाने काय सांगितले तो खर सांगायचा पण मित्रांना वाटे की एवढेसे सांगण्यासाठी याला बाजूला कशासाठी नेणार मित्र आपल्या पासून काहीतरी लपवयतोय अशी शंका यायची.

2) एखाद्याला सांगे की तो अमका टमका तुझ्याबद्दल तु भेकड आहे. एकमेकाकडे प्रत्येक जण संशयाचे बघायला लागला. हळूहळू एकता तुटली. एकत्र येणे चर्चा करणे निर्णय घेणे अंमलबजावणी करणे विश्वास करणे जेष्ठांचा आदर करणे वज्जी लोकांनी बंद केले ही वेळ साधून वर्षाकार ब्राह्मणाने अजातशत्रू राजास निरोप पाठवला ही वेळ योग्य आहे. वज्जी वर आक्रमणासाठी, अजातशत्रू ने आक्रमण केले. नगरमध्ये ढोल वाजवन आक्रमण ची नगरवर संकट आल्याची सूचना
ढोल वाजवून आक्रमण ची नगरवर संकट आल्याची सूचना देण्यात आल्या. पण कोणीही नगराच्या मुख्य दरवाजे बंद केले नाही. कोणीही गांभीर्याने ही सूचना घेतली नाही. एकत्र आले नाही. लढाईसाठी सज्ज झाले नाही शत्रू चा मुकाबला करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही परिणाम अजातशत्रू चे सैन्य नगरात घुसले कत्तली केल्या व वज्जी चे राज्य खत्म केले. त्या वेळे पर्यंत भगवान बुद्ध यांनी वज्जी वैशाली सोडलेले होते..

कथेचा संदेश….

संघटन किंवा समाजात एकता व शिलाचरण असेल तो पर्यंत प्रगती होते. अन्यथा विनाश होतो होतो हा * तथागत बुद्धाचा * संदेश आहे.

ज्या संघटने मध्ये आप-आपसात चढाओढ, एक दुसऱ्याचे पाय खेचण्याची वृत्ती, योग्यता नसतांना स्वतः मोठे बनण्याची अभिलाषा, संपत्ती हव्यास, पद-प्रतिष्ठा चा हव्यास निर्माण होतो, त्या लोकांचे ऐक्य दुभंगते ! आणि ऐक्य दुभंगल्या मुळे त्या लोकांना आपल्या दुश्मनांचे गुलाम व्हावे लागते । Organization is power