June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

श्रावण पौर्णिमेची पूर्व सध्या…..

अंगुलीमालावर विजय
श्रावण पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महत्वाची ठरली . भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनात राहत होते. वर्षावास काळ सुरु होता. त्यावेळी श्रावास्तीतील स्त्री-पुरुष भयभीत होते. राजाकडे रोज तक्रार घेऊ येत होते.
कारण श्रावस्तीच्या रहदारीच्या रस्त्यावर एक क्रूर हत्यारा रोज येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची हत्या करीत होता. आणि त्यांची करंगळी किंवा एक बोट धाग्यात बांधून गळ्यात घालून फिरत होता. म्हणून लोक त्याला अंगुलीमाल म्हणत असत.
श्रावस्ती नगरीचा राजा प्रसेनजीत चिंतेत होता. नगरवासी रोज राजाकडे जाऊन सांगत असत की तुम्ही त्या गुंडाचा,डाकुचा बंदोबस्त करा. नाहीतर आम्ही नगर सोडून जाऊ. राजाला काय करावे ते समजत नव्हते .
त्या समयी भगवान बुद्ध जेतवनात वास्तव्यास होते .आणि राजा प्रसेनजीत हा जेतवनात गेला व त्याने हा सगळा प्रकार तथागतांना सांगितला .
मग दुसऱ्या दिवशी सकाळीच तथागतांनी भिक्षापात्र हातात घेतले आणि अंगुलीमाल ज्या वाटेवर हत्या करीत होता त्या वाटेने चालते झाले. अंगुलीमाल त्याच्या झोपडीत बसला होता.
तथागतांना समोरून जातांना त्याने पहिले आणि तो विचार करू लागला ,की हा संन्याशी आहे. अंगुलीमालाने आतापर्यंत ९९९ माणसे मारली होती . त्याला त्याचा गुरु शिलभद्र याने १००० माणसे मारून त्यांच्या हाताची बोटे गुरुदक्षिणा म्हणून मागितली होती. म्हणून एक हजार मनुष्य मारल्यावर हजार माणसांची बोटे घेऊन तो गुरूकडे जाणार होता.
अंगुलीमाल खूप आनंदी होता तथागतांना त्या वाटेने येतांना पाहून त्याला त्याची गुरुदक्षिणा पूर्ण होतांना दिसत होती. हातात शस्त्र घेऊन तो तथागतांच्या मागे पळू लागला . तथागत पुढे चालत होते.
अंगुलीमाल तथागतांच्या मागे धावत होता परंतु तो त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नव्हता .आणि म्हणून त्याने तथागतांना जोरात ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला .तथागत त्याला म्हणाले ” अहिंसक मी थांबलो आहे . तूच धावत आहेस ,मी स्थिर आहे , तुझे मन चंचल आहे, ते हिंसक बनले आहे. तू विद्वान आहेस, शीलवान आहेस आणि तू अशी जनावरांसारखी मनुष्य हत्या करतोस तुला हे शोभा देत नाही .ह्या सर्वांनी तुझा काय गुन्हा केला होता ? म्हणून तू त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतलास आणि त्यांची हत्या केली . बघ ती बोटे सडली आहेत. किडे पडले आहेत. त्यांची दुर्घंधी सुटली आहे . ज्ञानी माणसाने हे कृत्य करणे बरे नाही. भगवान बुद्धांच्या वाणीने अंगुलीमालाच्या मनावर एकेक घाव बसत होते. तसे त्याच्या शरीरातील त्राण कमी होत होते. त्याचे अंग कंप पावत होते. करुणा, मैत्री भाव हा माणसाचा सर्वात महान असा धर्म आहे . तू त्या करुणा , मैत्रीची हत्या करतोस हे पाप आहे . शुद्धीवर ये आणि माणूस म्हणून जग . भगवान बुद्धांच्या वाणीने तो शांत झाला. त्याच्यातील हिंसक वृत्ती संपत आली, आणि त्याने तथातला शरण आल्याचे सांगितले व आजपासून मी कोणाचीही हत्या करणार नाही अशी कबुली दिली आणि हत्यार फेकून दिले. ” मला क्षमा करा ” मी अज्ञानापोटी हे सर्व केले. मला सन्मार्ग दाखवा ” असे म्हणून तो तथागतांच्या चरणी लीन झाला . आणि तथागतांनी त्याला आपला उपासक बनविले तो दिवस होता इ.स.पूर्व ५०४ त्यादिवशी श्रावण पौर्णिमा होती.
अंगुलीमालाच्या आईचे नाव मैत्रायणी होते, तर वडिलांचे नाव गार्ग असे होते. आणि अंगुलीमालाचे नाव अहिंसक असे होते.
अंगुलीमाल पुढे जाऊन महान भिक्खू झाला आणि त्याने निर्वाण प्राप्त केले व अर्हंत पदास गेला.
———–
२) पहिली धम्म संगीति
(२)दुसरी घटना अशी की,भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुभद्र नावाचा भिक्षु संघात दिशाभूल करू लागला .मन मानेल तसा अपप्रचार करू लागला .आणि भिक्षुसंघाच्या विनयामध्ये बदल होऊ लागला .
त्याला प्रतिबंध करून भगवंतांच्या वचनांचे संगायन करण्यासाठी भगवंतांचे आवडते शिष्य महाकाश्यापांनी पाचशे अर्हंत भिक्षूंची पहिली धम्मसंगीती श्रावण पौर्णिमेला आयोजित केली. ही धम्मसंगीति गृधक्रूट पर्वतावरील सप्तपर्णी गुंफा येथे ओयोजित केली भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनी ही धम्मसंगीती झाली त्रीपिटकाचे संगायन या संगीतीमध्ये झाले .आणि जगात सर्वात प्रथम धम्मग्रंथ निर्माण झाला तो त्रिपिटक होय.
मानवाच्या दुःखमुक्तीचे समग्र ज्ञान या ग्रंथात सामावलेले आहे .
म्हणून ह्या पौर्णिमेला जगात आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
नमो बुद्धाय…जय भिम