June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

“नकली भंतेजींचे लाड करणे बंद करा.” : भिक्खु संघ, मुंबई प्रदेश

बौद्ध जन हो, सावधान !

नकली भंतेजींचे लाड करणे, त्यांचे पालनपोषण करणे बंद करा. नकली भंतेजींची संख्या वाढवू नका. नकली भंतेजीमुळे धम्म नष्ट होत आहे. भिक्षु संघाची, समाजाची आणि देशाची बदनामी होत आहे. खूप मोठी हानि होत आहे.

चीवर परिधान करून घरोघरी फिरून पैसे गोळा करणारे लोकं (नकली भंतेजी) दिवसाला 5,000/- ते 10,000/- (पाच ते दहा हजार) रुपये गोळा करत आहेत.
कधी कधी तर दिवसाला 15,000/- रुपये ते 20,000/- (पंधरा ते वीस हजार) रुपये सुद्धा गोळा करत आहेत.

चीवर परिधान करून घरोघरी फिरून पैसे गोळा करणार्या लोकांचा भिक्षु संघाशी किंवा धम्माशी काहीही संबंध नाही.

चीवर परिधान करून घरोघरी फिरून पैसे मागणार्यांना (नकली भंतेजींना) जे लोकं पैसे/ वस्तू देत आहेत, ते खूप मोठे पाप-कर्म करत आहेत.

चीवर परिधान करून घरोघरी फिरून पैसे मागणारे अनेक जण नकली भंतेजी आहेत. त्यांच्या पैकी काही जण चोर पण आहेत. त्यांच्या पैकी अनेक जणांकडे नकली पावती पुस्तक, नकली ओळखपत्र, नकली कागदपत्रे असतात.

चीवर परिधान करून घरोघरी फिरून पैसे/ वस्तू मागणार्या लोकांना अनेक जण पैसे, वस्तू देत असल्यामुळे नकली भंतेजींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

दानाच्या नावेने पैसे, वस्तू मागत घरोघरी फिरणार्यांना (नकली भंतेजींना) अजिबात पैसे, वस्तू देऊ नका. एक रुपये सुद्धा देऊ नका.

चीवर परिधान करून तुमच्या घरी कुणी ही दान, पैसे, वस्तू मागण्यासाठी आल्यास, मोबाईल चा व्हिडिओ कॅमेरा सुरू करुन कॅमेरा समोर त्या व्यक्ती ची चौकशी करा. सर्व व्हिडिओ रेकाॅर्डींग करा. तुमचे नाव काय ? कोणत्या विहारात वास्तव्यास आहात ? प्रव्रज्या- उपसंपदा कधी, कुठे आणि कुणाच्या हस्ते झाली ? तुम्ही खरोखरच भिक्षु असल्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड दाखवा. पैसे मागत का फिरत आहात ? पैसे कशासाठी पाहिजेत ? पैसे मागत घरोघरी फिरण्यास बुद्धांनी सांगितले आहे का ? किंवा तुमच्या गुरूने सांगितले आहे का ? व्हिडिओ कॅमेरा समोर अशा प्रकारे चौकशी करा. आणि फोन करून वरीष्ठ भिक्षुंना त्या ठीकाणी बोलवा.

चारीका (भिक्षाटन) करत असलेल्या भंतेजींना दारासमोर, घराबाहेर उभे करून त्यांच्या भिक्षापात्रात श्रद्धेने भोजन वाढावे. फक्त भोजन. पैसे/ वस्तू अजिबात देऊ नये.

नियमानुसार भंतेजी पैसे किंवा अन्य कोणतीही वस्तू मागु शकत नाहीत. पिण्यासाठी फक्त पाणी मागु शकतात.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोचवा. बौद्ध समाजाच्या सर्व लोकांपर्यंत हा संदेश पहुंचला पाहिजे.
जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संदेश आहे

ह्या शिवाय नकली भंतेजींची संख्या कमी होणार नाही.
भिक्खु संघ, मुंबई प्रदेश