राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका ही एक चळवळ आहे. सामाजिक संचित निर्माण करणारे हे एक मोठ आंदोलन आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रयत्न काही सामाजिक, धार्मिक चळवळींकडून झालेत, परंतु ते अतिशय मर्यादित स्वरूपाचे होते. It was confined, temporal as well as individual. या पार्श्वभूमीवर अतिशय क्रियाशीलपणे आणि दृश्य स्वरूपाचे परिणाम घडवून आनणारे असे भारतातील आआंबेडकरी चळवळीतील एकमेव सामाजिक संचित निर्माण करणारे आंदोलन म्हणजे आर. जे. पी. ए. सामाजिक संचित निर्माण करण्याची आवश्यकता का पडली ?
आपण पाहतो की आपला समाज अतिशय भावनाशील आहे. आपल्या हक्क आणि अधिकाराप्रती तेवढाच जागृतही आहे. क्रांती करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत. कुठल्याही आंदोलनात, मोर्चे काढण्यात आणि समाजावरील आलेल्या कोणत्याही आपत्तीची सोडवणूक करण्यात, समाजाची कोणतीही मागणी आग्रही पद्धतीने मांडण्यात आपला समाज सदैव तत्पर असतो. मुळात ६०-७० वर्षाच्या सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये त्या प्रत्येक टप्प्यावरती समाजाची जी गरज असते ती पूर्ण करण्यासाठी चळवळी आपापल्या भूमिका मांडत असतात. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी आंदोलन पुढे चालविणाऱ्या ज्या काही चळवळी होत्या त्या सर्व चळवळींचा एक कॉमन मिनिमम काढला तर असे लक्षात येईल की, १९७४ ■ ७८ या काळात भरीव असं सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने विशाल दृष्टिकोन ठेवून एका चळवळीने दलित शोषित व उपेक्षित समाजात भातृभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने कोणतीही आंबेडकरी चळवळ Long lasting Impact समाजामध्ये निर्माण करू शकली नाही. अशा प्रकारे आंबेडकरी चळवळ फक्त नेत्यांपर्यंत मर्यादित झालेली आपण पाहतो.
आज प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या शासकीय धोरणामुळे समाजाच्या गरजा बदललेल्या आहेत, समस्या बदललेल्या आहेत आणि भविष्यसुद्धा बदललेलं आहे. अशा या बदलत्या परिस्थितीशी समाजाला जुळवून घेता यावे म्हणून जे काही सामाजिक संचित किंवा रिसोर्सेस निर्माण व्हावे लागतात ते रिसोर्सेस म्हणजे human रिसोर्सेस आणि Abstract रिसोर्सेस निर्माण करण्याचे कार्य RJPA नी यशस्वीपणे केलेले आहे. एकीकडे सामाजिक संचित निर्माण करणे आणि दुसरीकडे व्यक्ती-व्यक्तीमध्ये भ्रातृभाव (भाईचारा) निर्माण करणे हे भगवान बुद्धाने सांगितलं. समाजामध्ये बऱ्याचदा या गोष्टी बोलण्यात दिसतातही परंतु वर्तनातून किंवा वागण्यातून या गोष्टीचा परिपोष गेल्या बारा वर्षापासून RJPA च्या माध्यमातून आम्हीच केलेला आहे.
स्वातंत्र्यानंतर समाजाच्या आर्थिक, सामाजिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल होत असताना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणात प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे आर्थिक, सामाजिक स्तर उंचावलेला जो लाभार्थी वर्ग आहे तो बंगला बीवी-बच्चे च्या एकलकोंड्या संस्कृतीत रममान होताना दिसत होता. अशा प्रकारे समाजापासून दूर जात असलेल्या, सामाजिक दायित्वाची भावना हरवून बसलेल्या या वर्गाला पुन्हा समाजाभिमुख करणं आणि पुढील पिढीला दिशादर्शन व मार्गदर्शन करण्यासाठी काही करता येईल का ? या दृष्टीने अमरावतीला एका टीमने एकत्रितपणे एक प्रयत्न केला. मग त्याच्यासाठी सर्वांनी अभ्यासिकाच का निवडली ? होस्टेल निवडू शकले असते, कोचिंग क्लास किंवा बचतगट निवडू शकले असते किंवा अजून काही केलं असतं. परंतु सर्वानुमते असे ठरले की जे काही आपण निर्माण करू ते बुद्धिस्ट आणि आंबेडकरी विचार या दोन्ही गोष्टीचं प्रक्षेपण असलं पाहिजे. त्या अनुषंगाने जेव्हा विहारांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक विहार हे केवळ रिलीजियस प्लेस नसून ते एक सोशल ॲक्टीव्हीटी सेंटर आहे, शिक्षणाचे प्राथमिक केंद्र आहे. तक्षशिला, नालंदा, वल्लभी इत्यादी विद्यापीठांच्या मागे जी विहार व्यवस्था होती त्यातून समाजाचा वैचारिक, शैक्षणिक पाया सक्षम करून मूल्याधारीत समाज निर्मितीचा हेतू होता.
अशाप्रकारे विचार मंथन सुरू झाले. इतक्या मोठ्या विद्यापीठांचा, इतक्या मोठ्या विहारांचा जो गाभा होता तो विणजे अभ्यास-अभ्यासासोबत अभ्यासिका. तक्षशिला यामध्ये ३०० अभ्यासिका होत्या, तर नालंदामध्ये १८० अभ्यासिका होत्या. अभ्यासिका म्हणजे काय तर एका ठिकाणी येऊन नियमितपणे, निश्चितपणे, अविरत प्रयत्नांती ठरविलेल्या टार्गेटपर्यंत पोहोचणे. तुम्ही सामूहिकरित्या अभ्यास करा आणि तो अभ्यास केवळ त्याच्या दृश्य परिणामासाठी नाही करायचं की मला नोकरी लागली पाहिजे तर अभ्यासिका सांगते अदृश्य परिणाम. अदृश्य परिणाम म्हणजे एकमेकामध्ये निर्माण होणारा भातृभाव. माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचे आहे ही सामाजिक उत्तरदायित्वाची संवेदना निर्माण करणे, हा अभ्यासिकेचा महत्त्वपूर्ण हेतू असतो. आज RJPA ला आम्ही त्या परपरेशी जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत.
१९२४ ला ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन झाली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेबांनी तीन मुद्दे सांगितले. त्यातला पहिला मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला तो म्हणजे मुलाचे शिक्षण, कारण शिक्षण हे तुम्हाला विवेक आणि या प्राप्त करून देते. आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर शिक्षणापेक्षा माहितीचे अधिक स्रोत निर्माण झालेले आहेत. त्या माहितीतून ज्ञानापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन काही नवनवीन प्रयोग करावे लागतील. एक Individual व्यक्ती जेवढा विचार करतो त्यापेक्षा सामूहिकरित्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून बरेच काही मिळवता येऊ शकते, या उद्देशानेच होस्टेल किंवा बचतगट किंवा इतर काही करण्यापेक्षा आपल्याजवळ असलेली संसाधने काय आहेत, त्या संसाधनाचा ऑप्टिमम युज करता यावा व आपण निर्माण केलेल्या ह्युमन रिसोर्सेस किंवा आर्थिक संसाधनांचा प्रबुद्ध भारताच्या निर्मितीमध्ये उपयोग व्हावा म्हणून सर्वानुमते RJPA ची निर्मिती झाली.
RJPA च्या कुठल्याही पातळीवर असो, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, पुणे, मुंबई किंवा इतर कुठल्याही मुख्य टीम असू द्या, या सगळ्या टीम आहेत. जेव्हा या सर्व टीम म्हणून येतात तेव्हा ते फक्त co-ordinaters असतात. कोणीही जॉईन्ट कमिशनर नसतो, कोणी आयुक्त नसतो, कोणीही शिक्षक नाही, पत्रकार नाही की विद्यार्थी नाही. समन्वयकांची एक टीम म्हणून, सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. In short, whatever you do, you should decide as a team. ( थोडक्यात, तुम्ही जे काही कराल ते तुम्ही संघ म्हणून ठरवले पाहिजे. ) काम करण्याची हीच पद्धत RJPA च्या यशाचे गमक आहे, असे मला वाटते.
डॉ. प्रशांत रोकडे IRS
संयुक्त आयुक्त,
जी. एस. टी. नवी दिल्ली.
More Stories
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
बुद्ध आणि योग दिनाचे महत्त्व 🧘♀️