महाकवी नामदेव ढसाळ यांची सुंदर कविता…….
.
मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला
दोन वर्ग शिकला नसंन
पण मोठा माज आला ……
.
पडुन होता पोयट्यासारखा
घोंगवत होत्या माशा
नवता कपडा आंगावर
खराब होती दशा
आरक्षणच्या माथ्यावर
खुप मोठा साहेब झाला
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
.
खुप होत्या पोथ्या
अन् खुप होते देव
दररोज वात लावुन
म्हणे मले सुखी ठेव
पहील्या वर्गापासुन
खुप सवलत घेत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला……..
.
नवतं त्याच्या पिढीत
कधी कुणी शिकलं
वावरात नारळ फोडुन
कधी नाही पिकलं
बांधावरचं पाणी
दिमाखानं घेत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
.
ज्यानं केला राग त्याचा
त्याच्या मागं धावला
त्याच्या सांगण्यावरुन
फोटो नाही लावला
त्याचं जड पारडं
तु हलकं करत आला…
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला…..
.
तुले नवतं माहीत
तु आहे कोण
कायदयाच्या नावानं
करत हात दोन
तु आता कायदा
लोकाले सांगत आला……
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला …..
.
नाही आपली अक्कल
भिमावानी केली
त्याच्या एवढ शिकावं
हिम्मत नाही केली
दम नाही रक्तात
पण जातीभेद करत आला…..
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला……
.
आतातरी सुधर
सोड आता गर्व
धर्मग्रंथाच्या नावानं
करुन दाखव सर्व
माहीत असुन तुले
मस्त नाटक करत आला ……
अन् मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला ……
मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला

More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण