📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग चवथा – नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधिलाभ
🌼 ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले. 🌼
१. ज्ञानप्राप्ती होण्यापूर्वी गौतम फक्त बोधिसत्व होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले.
२. बोधिसत्व म्हणजे काय आणि कोण ?
३. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्यासाठी प्रयासरत व्यक्ती.
४. बोधिसत्व बुद्ध कसा होतो ?
५. बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्तीसाठी पात्र होण्याकरिता काय करणे आवश्यक आहे ? बोधिसत्वाने सतत १० जन्मपर्यंत बोधिसत्व राहिले पाहिजे.”
६. प्रथम जन्मी तो ‘मुदिता’ (आनंद) प्राप्त करतो. ज्याप्रमाणे सुवर्णकार सोन्यारुप्याला अग्नीत भाजून त्यांचे हीन घालवितो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या चित्ताची अपवित्रता त्यागतो. त्याला स्पष्टपणे असे दिसते की, मनुष्य कितीही प्रमादी असला तरीही त्याने आपला प्रमाद त्यागला तर तो मेघमुक्त चंद्रासारखा आपल्या मृदु कोमल किरणांनी हे जग प्रकाशित करू शकतो. याचा बोध झाल्यावरच मुदिता उत्पन्न होते. त्याच्या चित्तात सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची इच्छा उत्पन्न होते.”
७. “आपल्या दुसऱ्या जन्मी तो ‘विमलता’ (पावित्र्य) प्राप्त करतो. बोधिसत्वाने वासना विकारांपासून मुक्ती प्राप्त केली असते. त्याच्या चित्तात करुणा वसते. तो सर्वाप्रति करुणामय असतो. तो अवगुणांची मिथ्या स्तुती करीत नाही किंवा सद्गणांना निरुत्साहीही करीत नाही.”
८. बोधिसत्व आपल्या तिसऱ्या जन्मी ‘प्रभाकारी’ (तजस्विता) अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्वाची प्रज्ञा दर्पणासारखी पारदर्शी होते. त्याला अनात्म आणि अनित्य या संबंधीच्या सारतत्त्वाचे पूर्णत्वाने आकलन झालेले असते. श्रेष्ठतम प्रज्ञा प्राप्त करणे ही त्याची एकमेव आकांक्षा असते. त्यासाठी कोणताही त्याग करावयास तो तत्पर असतो.”
९. आपल्या चवथ्या जन्मी तो, “अर्चिश्मती” (प्रखर बुद्धिमत्ता) ला प्राप्त होतो. बोधिसत्व या जीवनात अष्टांग मार्गावर आपले चित्त एकाय करतो. विचारांच्या चार आयामावर तो आपले चित्त एकाम करतो. प्रयत्नाच्या चार आयामावर तो आपले चित्त एकाम करतो. इच्छाशक्तीच्या चार आयामावर तो आपले चित्त एकाय करतो आणि शीलाच्या पाच आयामांवर तो आपले चित्त एकाम करतो.
१०. पाचव्या जन्मी बोधिसत्व “सुदुर्जय” प्राप्त करतो. सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सहसंबंधाची त्याला पूर्णत्वाने अनुभूती होते.
११. बोधिसत्व आपल्या सहाव्या जन्मी “अभिमुखी” होतो. या अवस्थेत बोधिसत्व वस्तूंच्या उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी सिद्ध होतो. कारणमिमांसा बारा निदान आणि त्याचे ज्ञान “अभिमूख” म्हणून संबोधिले जाते.” याचा परिणाम म्हणून जे अविद्येने दृष्टिहीन झाले आहेत अशा सर्व प्राणीमात्रांप्रति त्याच्या चित्तात श्रेष्ठतम करुणेचा उदय होतो.
१२. आपल्या सातव्या जन्मी बोधिसत्व “दुङ्गगमा” अवस्थेला प्राप्त होतो. बोधिसत्व आता काळ आणि व्याप्तीच्या पलीकडे गेलेला असतो. तो अनंताशी एकरूप झालेला असतो. तरीही प्राणिमात्रांप्रति, असीम करुणेपोटी तो आपले नामरूप धारण करून असतो. पद्मदल (कमळ) जलात राहूनही जलस्पर्श विरहित असते तद्वतच बोधिसत्व या अवस्थेत प्राणिमात्रात राहूनही त्याच्यापासून वेगळा असतो. या जगात राहूनही तृष्णा त्याला स्पर्श करीत नाही, तो आपल्या बंधुवांधवांच्या कल्याणाचीच कामना करतो. तो दातृत्ववान असतो. तो शांत असतो. तो वीर्यशाली असतो. तो क्षमाशील असतो. तो बुद्धीवंत असतो आणि तो प्रज्ञावंतही असतो.
१३. या जीवनात त्याला धम्माचे ज्ञान होते. लोकांना समजेल अशाप्रकारे तो त्यांना धम्म समजावून सांगतो. कुशल आणि क्षमाशील असणे आवश्यक आहे याची त्याला जाणीव होते. प्रतिसाद म्हणून मनुष्यमात्राने त्याच्याप्रति कोणताही व्यवहार केला तरी तो त्यांच्याप्रति समचित्त असतो. ते अज्ञानी आहेत म्हणून त्यांना त्याचा हेतू समजला नाही हे तो जाणतो त्याचवेळी मनुष्यमात्राच्या कल्याणाच्या आपल्या कर्मात तो कोणतीही शिथिलता येऊ देत नाही. या कामी तो आपली ऊर्जा कमी पडू देत नाही. तो आपले चित्त ज्ञानप्राप्तीपासून विमुख होऊ देत नाही. म्हणून त्याच्यावर कितीही विपत्ती येवो, तो सुपथावरून कधीही विचलित होत नाही.
१४. आपल्या आठव्या जन्मी बोधिसत्व ‘अचल’ अवस्थेला प्राप्त होतो. ‘अचल’ अवस्थेत बोधिसत्व सर्व प्रकारच्या संघर्षापासून मुक्त होतो. त्याच्या हातून विनासायास कुशल कर्म होतात. तो जे काही करतो त्यात तो यशस्वी होतो.
१५. आपल्या नवव्या जन्मी तो ‘साधुमती’ अवस्थेला प्राप्त होतो. ‘साधुमती’ ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेत बोधिसत्वाने सर्व धर्म किंवा प्रणालीवर विजय मिळविला असतो किंवा त्यांना भेदले तरी असते. त्याने सर्व दिशांवर विजय मिळविला असतो. त्याने समयचक्रावर विजय मिळविला असतो.
१६. आपल्या दहाव्या जन्मी बोधिसत्व “धम्ममेधा” अवस्थेला प्राप्त होतो. या अवस्थेत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते.
१७. बोधिसत्व या दहा अवस्थातून जाऊन बुद्धत्वाला प्राप्त होतो. या दहा अवस्था म्हणजे दहा शक्ती होत. बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला या दहा अवस्थांतून जाणे क्रमप्राप्त आहे.
१८. बोधिसत्व उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो व दहा शक्ती प्राप्त करतो. परंतु एवढ्यानेच भागत नाही. त्याने दहा पारमितांचे पूर्णत्वाने पालन करणेही आवश्यक आहे.
१९. एका जन्मी एक पारमिता पूर्तीयोग्य आहे. पारमितात विशेषत्व प्राप्त करण्यासाठी त्याने क्रमाक्रमाने दहा अवस्थातून जाणे आवश्यक आहे. एका जीवनात एकच पारमिता. थोडीशी एक आणि थोडीशी दुसरी हे योग्य नाही.
२०. अशा प्रकारे दोहो बाजूंनी जेव्हा बोधिसत्व सामर्थ्यसंपन्न होतो तेव्हाच तो बुद्धत्वाच्या
प्राप्तीसाठी पात्र ठरतो. बोधिसत्वाच्या जीवनाची पराकाष्ठा, अंतिम अवस्था म्हणजेच बुद्धत्व होय.
२१. जातक सिद्धांत अथवा बोधिसत्वाच्या अनेक जन्माचा सिद्धांत हा अवतारवादाच्या ब्राह्मणो सिद्धांतासारखा वाटण्याची शक्यता आहे. उदा. देवाचे अवतार घेणे.
२२. जातक सिद्धांताचा आधार बुद्धाच्या जीवनाची, श्रेष्ठतम श्रेणीची पवित्रता हा आहे.
२३. अवतारवादाच्या सिद्धांतात मात्र देवाचे पवित्र असणे आवश्यक नाही. अवतारवादाचा ब्राह्मणी सिद्धांत एवढेच सांगतो की, देव विविध रूपात अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो. देव आचरणात अनैतिक आणि अपवित्रही असू शकतो.
२४. बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी बोधिसत्वाला दहा जन्मपर्यंत श्रेष्ठतम जीवन जगावे लागते श्रेष्ठतम जीवनाचा हा सिद्धांत अन्य कोठेही नाही. याच्याशी तुलना करता येईल असा सिद्धांतच उपलब्ध नाही. कोणताही धर्म आपल्या संस्थापकासाठी अशी कठोर परीक्षा घेणे आवश्यक मानत नाही.
🌼 बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले. ( समाप्त )…. 🌼
More Stories
Buddha and his Dhamma बुद्ध आणि त्याचा धम्म
🌼 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. 🌼 The lament of a warrior and the joy of a monk.
आत्मा आणि पुनर्जन्म या सिद्धांताचे आलोचक