एक गैरसमज अनेक शतकांपासून पद्धतशीरपणे भारतात आणि परदेशात पसरवला गेला आहे. तो हा की भारतातील आयुर्वेदशास्त्र अति प्राचीन असून, शुश्रुत आणि चरक या दोन महाविद्वानांनी हे ज्ञान समस्त जगाला दिले आहे. यातील आयुर्वेद म्हणजेच “चिकित्सा आणि नैसर्गिक औषधे” हे शास्त्र जरी प्राचीन होते तरी त्याकाळात ते पूर्ण विकसित नव्हते.
ब्राह्मणी परंपरा असे मानते कि ब्रह्मदेवाने आयुर्विज्ञान हे प्रजापतीला दिले आणि ते त्याने इंद्राला दिले. तेथून ते धन्वंतरीची रूपात असलेल्या काशी नरेश दिवोदासला मिळाले जे त्याने सुश्रुतला दिले आणि मग सुश्रुताने, संहिता लिहून जगासमोर आणली. इंद्राने हेच ज्ञान नंतर अत्रेय पुनर्वसू यांना दिले जे त्यांनी अग्निवेशाला दिले आणि अग्निवेशाने ते चरकला शिकविले ज्याने नंतर चरक संहिता लिहिली.
विशेष म्हणजे वैदिक काळात अशी मान्यता होती कि शाररिक व्याधी या जादूटोणा, राक्षसी शक्ती किंवा तंत्रमंत्र याने होते! मग जर व्याधी अशा काल्पनिक कारणाने होत असेल तर त्यांचा उपचार नैसर्गिक औषधाने कसा होऊ शकतो?
केनेथ झिस्क त्यांच्या “Asceticism and Healing in Ancient India” या पुस्तकात लिहितात की अशा प्रकारच्या “भाकड कथा” भारतीय वैदिक परंपरेत दिसतात.
पालि भाषेत “चर” म्हणजे फिरणारा किंवा “चंक्रमण” करणारा असा होतो. बौद्ध धम्मात असे चंक्रमण करणारे बौद्ध भिक्खू असत हे सर्वांना माहीत आहेच. चरक या शब्दाचा मूळ धातू चर आहे.
देबीप्रसाद चटोपाद्यांनुसार हे Science and Society in Ancient India या पुस्तकात लिहितात की “चरक संहिता”चा अर्थ त्याकाळात भटकंती करणारे बौद्ध श्रमण यांनी हे ज्ञान एकत्रित केले आहे असा होतो. सुश्रुत यांच्याबद्दल देखील कुठलीही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसून, अभ्यासकांच्या मते अनेक जणांनी मिळून ही संहिता लिहिली आहे. म्हणजेच शुश्रुत नावाचा कोणी व्यक्ती झालेला नाही, तर ते एक काल्पनिक पात्र तयार केले गेले आहे!
१९०७ मध्ये सुश्रुत संहितेचे इंग्रजीत संपादन करणारे कविराज कुंजलाल भीषगरत्न लिहितात कि सुश्रुत संहितेची रचना ही “माध्यमिक बौद्ध आचार्य नागार्जुन” यांनी लिहिलेल्या एका संहितेचा आधार घेऊन लिहिलेली आहे. सुश्रुतबद्दल आमच्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही असे कविराज कुंजलाल स्पष्ट लिहितात. याचाच अर्थ, आज जो शुश्रुत संहिता ग्रंथ आहे, त्याचे मूळ लिखाण बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी लिहिले आहे आणि नंतरच्या काळात कोणी तरी या ग्रंथाची नक्कल करून, शुश्रुत हे काल्पनिक नांव दिले. याचाच अर्थ आचार्य नागार्जुन यांना कुठलेही credit मिळू नये म्हणून हा सगळा खटाटोप!
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थनिस याने देखील श्रमण आणि त्यांच्या सखोल वैद्यकीय ज्ञानाबद्दल लिहिले आहे. बौद्ध भिक्खू जेव्हा लोकांना धम्म सांगत, तेव्हा लोकांच्या व्याधींसाठी देखील औषधोपचार करीत. याचाच अर्थ आयुर्विज्ञानाची खरी बैठक बुद्धकाळात झाली आणि बौद्ध भिक्खुंनी या ज्ञानात संशोधन करीत, अनेक नवीन उपाय शोधले जे त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी आणले. बुद्धविचारांसोबत उत्तोरोत्तर तिचा प्रसार देशात व परदेशात वाढत गेला.
बौद्धकाळात विकसित झालेले आयुर्विज्ञान, ८व्या ते १०व्या शतकानंतर वैदिकपूर्व काळाशी जोडण्यात आले आणि हे ज्ञान ब्रह्मदेवाने, शुश्रुत आणि चरक यांना दिले असा खोडसाळपणा करण्यात आला.
भारतीय आयुर्विज्ञान इतिहासात केवळ जीवक यांचा काळ तसेच चिकित्सा आणि निदान पद्धतीबद्दल अचूक माहिती मिळते. जगातील सर्वात प्राचीन मेंदूची आणि पोटाची शस्त्रक्रिया आचार्य जीवक यांनी केल्याचा उल्लेख आहे. आचार्य जीवकांनी संशोधित केलेल्या अनेक चिकित्सा व औषधपद्धती नंतरच्या काळात इतरांच्या नावावर प्रसिद्ध झाल्या.
जगभरातील आयुर्विज्ञान शाखेत गौरविलेले जीवकांना मात्र भारतातील आजच्या आयुर्वेदाच्या शिक्षणात कुठलेही स्थान देण्यात आले नाही ही इथल्या ‘आयुर्वेदाचार्यांची’ नीच मानसिकता नव्हे काय?
म्हणूनच इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे…
अतुल मुरलीधर भोसेकर
9545277410
More Stories
Buddhist Meditation : बौद्ध ध्यानासाठी संपूर्ण मार्गदर्शक: तत्त्वे, तंत्रे आणि फायदे
बौद्ध समाजात भावकी पाहिजे – आद. आयु सयाजी वाघमारे
त्रिरश्मी बुध्दलेणी व वर्षावास परस्पर संबंध