June 4, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड

” आज अस्पृश्य समाजास अत्यंत निकडीचे असे कोणते कार्य असेल तर ते शिक्षण प्रसार हे होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच हरएक संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल ह्या प्रश्नाकडे लक्ष पुरवले पाहिजे व त्या अनुरोधाने आपल्या कार्याची दिशा ठरवली पाहिजे.
या देशातील उच्च नीचता दृढमूल होण्यास समाजातील जाती व्यवस्था हे तर कारण आहेच पण तीस चिरस्थायित्व जातीतील गुणवैशिष्ट्ये या मुळे आले आहे. काही ठराविक जातीचे श्रेष्ठत्व इतर जातीतील ज्ञानाभावामुळे कायम राहिले. सरकार दरबारातील मोठमोठ्या नोकऱ्या, मामलतदारी किंवा पोलीस अधिकारी वगैरे सारख्या लोकांवर सत्ता गाजवणाऱ्या जागा या सर्वात अस्पृश्य समाजास अद्यापपावेतो संपूर्ण मज्जाव आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात या समाजाची अवहेलना तर होतेच पण या समाजाकडे इतर जातींचा पाहण्याचा दृष्टीकोनही अगदी भिन्न प्रकारचा असतो. हा आकुंचित दृष्टिकोन बदलून आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनात वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावयाची असेल तर त्यास रामबाण उपाय म्हणजे या आंमलदारीच्या जागा संपादन करणे हा होय.
जेव्हा आपला व्यक्तीविषयक लौकीक वाढवणे व त्याचबरोबर आपल्या समाजाची योग्यता वाढवणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे.”
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड- १८, भाग-१, पान न- ३०७)
शनिवार, दि.१० सप्टेंबर १९३२ चे परळ, मुंबई येथील दामोदर हॉल मधील बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.
🌹🌹🌹 ज्यांनी आमच्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तसेच ज्यांनी राज्यघटनेद्वारे आम्हाला शिक्षण उपलब्ध करून देणे अशा महामानवास कोटी कोटी प्रणाम.🌹🌹🌹