June 3, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अन्याय करणाऱ्यांना स्वराज्य मागण्याचा काय हक्क?

“मी जे कार्य करत आहे ते खरे म्हटले तर तुमचे कार्य आहे. तुम्ही पिढ्यानपिढ्या करून ठेवलेले पाप मला निस्तरावे लागत आहे. या पापाची जबाबदारी माझ्यावर नाही, अस्पृश्यांवरही ती नाही. ती सर्वस्वी आपणा स्पृश्यांवरती आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये.
हे पाप कायम ठेवून तुम्ही जी स्वराज्याची चळवळ करित आहा व तुम्ही पूर्ण स्वराज्याची जी मागणी करीत आहात ती संशयास्पद वाटते, हे मी तुम्हास स्पष्ट सांगत आहे. अस्पृश्यांना पिण्यास पाणी मिळत नाही, त्यांना लोकसंख्येच्या मानाने नोकरी मिळत नाहीत वगैरे अन्यायाची सर्व जबाबदारी तुम्हावरच आहे. दुसर्‍यास नाडणाऱ्या तुम्हास स्वराज्य मागण्याचा काय हक्क आहे, हे मला समजत नाही. आपले राजकीय कार्य तात्पुरते थांबून तुम्ही अस्पृश्यता नष्ट केली तर तुम्ही प्रामाणिक आहा, हे सिद्ध होईल.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-२,पान नं. २९३)
दि.२६ डिसेंबर १९३९रोजी बेळगाव म्युनिसिपालिटी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.