महा कर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाला, पूर्ण निधीचा वापर केला नाही , पुन्हा शासनातर्फे सुशोभीकरण करून द्यावे अन्यथा आंबेडकरी जनता जन आंदोलन करेन….
नासिक ( प्रतिनिधी – शशिकांत भालेराव,भिम नगर )नाशिक रोड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक रोड येथील महा कर्मभूमी बुद्ध विहारया वास्तूचे काही अपूर्ण अवस्थेत असलेले कामाचे पूर्णत्वास करण्यासाठी माजी आमदार नाशिक पूर्वचे बाळासाहेब सानप यांनी आमदार निधीतून महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2016, 17 अंतर्गत नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील महाकर्मभूमी बुद्ध विहाराची पर्यटन विकास कार्यक्रमा अंतर्गत सुशोभीकरण करण्यासाठी रुपये 45 लाखाचा निधी नाशिक रोड येथील बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांनी मंजूर करून घेतला होता .हा निधी नाशिक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांनी नाशिक महा कर्मभूमी बुद्ध विहाराचे सुशोभीकरणाकरिता रुपये 45 लाखाचा निधी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग केलेला आहे.हा निधी फक्त महाकर्मभूमी बुद्ध विहाराची सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु या निधीचा वापर सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी नाशिक रोड येथील महा कर्मभूमी बुद्ध विहाराचे सुशोभीकरणावर पूर्णपणे खर्च केलेला दिसत नाही. कारण की बुद्धविहाराच्या समितीने सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांना सांगितल्याप्रमाणे विहाराचे सुशोभीकरण कशा पद्धतीने कामाचे स्वरूप व कसे काम करावे जेणेकरून हे बुद्ध विहाराचे नाव जगात राहील .असे समितीने सांगितले होते.
कारण ही भूमी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून हे बुद्ध विहारआंबेडकरी समाजाचे अस्मितेचे ठिकाणअसून.सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी या विहाराच्या सुशोभीकरणावर पाहिजे तसे काम केलेले नाही त्यामुळे ही आंबेडकरी जनतेची फसवणूक असून आंबेडकरी जनता ही सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्यावर नाराज असून.रुपये 45 लाखाचा हा निधी पूर्णपणे खर्च न करता दुसरीकडेच कुठेतरी याचा वापर केलेला आहे असे वाटत आहे. आंबेडकरी जनता महाराष्ट्र शासनाला मागणी करत आहे की लवकरात लवकर शासनाने याची त्वरित दखल घेऊन या कामात ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर आंबेडकरी जनतेची फसवणूक केली म्हणून कायदेशीर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे व महाराष्ट्र शासनाने महाकर्मभूमी बुद्ध विहार नाशिक रोड यांचे पुन्हा शासनातर्फे सुशोभीकरण करून हे बुद्ध विहार एक जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र झाले पाहिजे.असे तयार करण्यात यावे .कारण हे बुद्ध विहार रेल्वे स्टेशनच्या जवळ असून भारतामध्ये येणारे बौद्ध धर्मीय तसेच मुंबई नागपूर या रेल्वे मार्गाने प्रवास करणारी बौद्ध धर्मीय या बुद्ध विहाराला बघण्यासाठी व भेट देण्यासाठी आवर्जून आले पाहिजे.अशा प्रकारे या बुद्ध विहार सर्व प्रकारचे सुविधाने सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आंबेडकर जनता व महाकर्मभूमी बुद्ध विहाराचे अध्यक्ष विलास गांगुर्डे साहेब व समितीचे सर्व सदस्य यांच्यातर्फे महाराष्ट्र शासनाला मागणी करत आहे. अन्यथा आंबेडकरी जनता जन आंदोलन करून शासनाला याचा जाब विचारतील असे बुद्ध विहार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधी – शशिकांत भालेराव,भिम नगर . मोबाईल : 9021102034
More Stories
२२ देशांतील मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धकांनी बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन बुद्धवनम स्थळाला भेट दिली
त्रिपुरा: शांतीच्या संदेशाने धम्म यात्रा सुरू: सबरूम ते धर्मनगर असा बौद्ध धम्मपदयात्रा
महाबोधी विहार अपवित्रतेमुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरवर परिणाम झाला आहे.