अशोकाने मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे अनेक भव्य स्तूप, गुफा, बा विहार, मठ, विद्यापीठे इ. च्या रूपाने आपलीं स्मृतिचिन्हें मार्गे ठेविली असली त त्याच्या संबंधानें जी इतिहाससामुग्री उपलब्ध झाली आहे ती मुख्यतः त्याचे गिरिलेख ऊर्फ आदेश (पर्वतावर कोरून ठेविलेले लहानमोठे शिलालेख), स्तंभलेख म्हणजे दगडी स्तंभ उभारून त्यावर कोरलेले लेख, गुहालेख व इतर स्फुटलेख यांच्यापासूनच मिळालेली आहे, आणि म्हणून इतिहासकारांच्या दृष्टीनें तींच त्याची स्मारके अत्यत महत्त्वाची आहेत. त्या लेखातून त्याच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांविषयींची जग विशेष काही माहिती मिळाली नाहीं, तरी तत्कालीन भाषा, लिपि, समाजस्थिति, धर्म व्यवहार व संस्कृति यासंबंधाने विश्वसनीय माहिती मिळते असे कोरलेले लेख एकदर पस्तीस आतापर्यंत मिळाले आहेत. ‘हे लेख हिंदुस्थानातल्या बहुतेक सगळ्या प्रांतातून विखुरलेले आढळतात.
अशोकाच्या लेखाचे पाच वर्ग पाडतां येतात. ते असे-
स्तंभाचे वर्णन : १. स्तंभलेख; २. लघुस्तंभलेख, ३. मोठे गिरि-लेख- ४. लघुगिरि लेख, व ५. स्फुटलेख हुएन त्सांगच्या प्रवासवृत्तात्तात अशोकनिर्मि सोळा स्तंभलेखांचा उल्लेख आहे. | Beal’s Record of Western World Vol 1 प्रत्येक स्तंभ सबंध एका दगडाचा केलेला होता. त्यांत कोठें जोड नव्हता. त्याव कारागिरीचें सुंदर कामहि केलेलें होतें. या सोळा स्तंभापैकी या घटकेपर्यंत अ स्तंभांचा शोध लागला आहे. पैकीं बखिरा व लडियागड येथील दोन स्तंभ अग शाबूत आहेत. उपलब्ध झालेल्या स्तंभाचे स्वल्प वर्णन येथे देणे आवश्यक आहे.
१. नुकता गेल्या जुलै महिन्यांत बुद्धाच्या जन्मस्थानासंबंधाचा आणखी एक लेख ओरिसाप्रा सापडला आहे.
१) बखिरास्तंभ – हल्लींच्या मुजफरपूर जिल्ह्यात बेसार (प्राचीन वैशाली) गावाजवळ आहे. या स्तंभावर लेख होतेसें दिसत नाहीं. पायथ्याशी याचा व्यास पन्नास इच असून मध्यभागापासून वर निमूळता होत होत शिखराचा व्यास ३८ ७ इच झाला आहे. शिखरावर दोन फूट १० इंच घेराचे एक मंडल असून त्यावरच्या एक फूट उचीच्या वेदीवर ४।। फूट उंचीची एक सिंहमूर्ति बसविण्यात आली आहे. स्तंभाचें वजन सुमारे पन्नास टन भरेल असे कनिंगहॅम म्हणतो.
२) लडिया-नंदगडस्तंभ – चंपारण जिल्ह्यांत बेथियापासून नेपाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर लडियागांवाजवळ हा स्तंभ आहे. याची उंची ४० फूट, मध्यभाग ३२ फूट ८॥ इंच, पायथ्याचा व्यास ३५ ।। इंच व शिखराचा व्यास २२ ४ इंच असून त्यावर हसाची सुंदर चित्रे कोरलेली आहेत. शिखराच्या वर लहानशा बेदीवर पूर्वाभिमुख सिंहाची मूर्ति आहे. ती आता भग्न झाली आहे. औरंगजेबाच्या कारकीर्दीत तोफेच्या गोळ्याने सिंहाची मूर्ति छिन्नविच्छिन्न झाली असे सांगतात. या स्तंभावर चार लेख आहेत.
३) प्रयाग येथील स्तंभ हा यमुनातीरावरच्या प्रयाग (अलाहाबाद ) च्या किल्ल्यात आहे. यावर सिंहाचे किंवा हंसाचें चित्र नसून कमलपुष्प व लता यांच्या चित्रांनी हा सुशोभित केलेला आहे. यावर राणीचा आदेश कोरलेला आहे. ‘
४) रामपूरस्तंभ – हे दोन स्तंभ चंपारण्य जिल्ह्यांत पिपारिया गावापासून सुमारें एक कोसावर आहेत. दोन्ही स्तंभ ध्वंसप्राय स्थितीत आहे. एकावर सहा निरनिराळ्या स्तंभांवरचे लेख कोरलेले आहेत. एका स्तंभावर एक अतिशय सुंदर सिंहमूर्ति बसविलेली होती, व दुसऱ्यावर बैलांची मूर्ति खोदलेली होती.
५) (अ) दिल्ली-तोप्रास्तंभ – हा दिल्लीजवळ फिरोजाबादेच्या अंतर्गत असलेल्या कोथील नांवाच्या पहाडाच्या माथ्यावर आहे. हा फिरोज तुघलख बादशहानें तोपऱ्याहून आणून दिल्ली येथे बसविला. यावर सात स्तंभलेख स्पष्ट आहेत. यालाच हल्ली ‘शिवालिक’ किंवा ‘फिरोजशहाची लाट’ म्हणतात.
(आ) दिल्ली-मीरतस्तंभ – हाहि दिल्लीजवळच एका उंच जाग आहे. तो मूळ मीरत येथे होता. पुढे फिरोज तुघलखाने मोठ्या परिश्रमानें दिल्लीस आणून बसविला, यावर पहिले चार अपूर्ण स्तंभलेख आहेत. (६) लडिया-अरराजस्तंभ- चंपारण्यात अरराज नावाचे एक शिवमंदिर आहे. तेथून एका मैलावर हा स्तंभ आहे. यावर सहा स्तंभलेख कोरलेले असून स्तंभावर गरुडमूर्ति बसविली आहे.
७) सांचीस्तंभ – भोपाळ संस्थानात भेलशाजवळ एका टेकडीवर एक मोठा भव्य स्तूप आहे त्याच्या दक्षिणद्वारापाशी हा स्तंभ आहे. याच्या शिखरावर चार सिंहमूर्ति आहेत.
८) सारनाथस्तंभ काशीक्षेत्राच्या उत्तरेस दोन कोसांवर एक मोठा स्तूप आहे. र धर्मचक्राचे व चार सिहांची चार अशी पाच चित्रे कोरलेली आहेत. ह्या स्तंभाचा शोध अलीकडेच म्हणजे १९०५ साली लागला.
९) रुम्मिनीदेवीस्तंभ संयुक्तप्रांतात बस्ती जिल्ह्यांत दुल्हार नावाच्या गावापासून उत्तरेस सहा मैलांवर रुम्मिनी देवीचे मंदिर आहे. त्याच्यासमोर हा स्तंभ आहे. यावरहि एक लेख आहे.
१०) निग्लीवास्तंभ बस्ती जिल्ह्यातल्या नेपाळ-तराईत निग्लीवा गांवापाशी |हा स्तभ आहे. यावरहि एक लेख आहे.
इ. स. च्या पाचव्या शतकांत हुएन-त्सांगनें लिहिलेल्या आपल्या प्रवासवृत्तात ८ ९ या दोन्ही स्तंभांचा उल्लेख आहे.
याशिवाय श्रावस्तीनगराजवळच्या जेतवन विहाराजवळ दोन स्तंभ आहेत. तसेच नेपाळ-तराईच्या जंगलात आणखी पुष्कळ लहान मोठे स्तंभ अज्ञात राहिले असले पाहिजेत असे तज्ञांचे म्हणणे आहे.
गिरिलेख ऊर्फ आदेश – अशोकाच्या गिरिलेखांपैकी चौदांचा शोध आतापर्यंत लागला आहे, आणि त्यातले बहुतेक त्याच्या कारकीदींच्या तेराव्या चौदाव्या वर्षातले आहेत असे तज्ज्ञाचें अनुमान आहे. या लेखांतून दिलेली वर्षसंख्या ही अशोकाच्या राज्याभिषेकाच्या काळापासून गणना करून आलेली संख्या आहे. हे लेख ख्रि. पू. २५७ आणि २५६ यांच्या मधल्या काळातले असावे. मगधराज्यापासून बऱ्याच दूरच्या अशा बारा निरनिराळ्या प्रांतातून ते सापडले आहेत.
साहबाजगढी येथील गिरिलेखाचा शोध प्रथम लागला. हे ठिकाण पेशावरच्या पलीकडे युसफझाई प्रातांत आहे. तेथे डोंगराच्या खडकावर अशोकाचा बारावा आदेश कोरलेला आहे. दुसरा एक गिरिलेख सरहदीवरील प्रांतात हजरा जिल्ह्यात मानसेरा येथे आहे. हे दोन्ही खरोष्ठी लिपीत आहेत. तिसरा एक आदेश देहरादून जिल्ह्यांत कालसी बापाशी आहे. तो चौदावा आहे. ठाणे जिल्ह्यात डोपारा येथे एक आदेश आहे.. काठेवाड प्रांतात जुनागड संस्थानात गिरनार पर्वतात आणखी एक आदेश आहे. ओरिसा प्रांतांत बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यापाशी एकाच आदेशाच्या दोन नकता मिळाल्या आहेत. एक भुवनेश्वरापासून तीन कोसांवर धौली येथे व दुसरी गंजम जिल्ह्यात जौगड येथे. या दोन्ही ठिकाणी चौदावा आदेशलेख असून त्याला परिशिष्ट म्हणून दोन कलिंगलेख जोडले आहेत..
या चौदा आदेशांवरून अशोकाचा धर्म व त्याची राज्यपद्धति यांच्या संबंधाची बरीच माहिती मिळते.
‘वर जे दोन कलिंगलेख म्हणून सांगितले आहेत ते अशोकाच्या कारकीदींच्या १४
ज्या किंवा १५ व्या वर्षी म्हणजे कलिंगविजयानंतर लवकरच कोरले गेले असावेत असे अनुमान आहे. कारण या दोन्ही लेखांत नुकत्याच जिंकलेल्या या प्रांताचा बंदोबस्त कसा ठेवावा व राज्यकारभार कसा करावा याविषयींच्या हुकुमवजा सूचना आहेत.
गुहालेख : स्तंभलेख आणि गिरिलेख (किंवा आदेश) यांच्या शिवाय अशोकाचे तीन गुहालेख आहेत. हे गवेजवळ बारावर नावाच्या पहाडांत आहेत. यांत या गुहा किंवा गुफा आजीवकांना दिल्याबद्दलचा उल्लेख आहे. मोठे गुहालेख आतापर्यंत तीन सापडले आहेत. हे तिन्ही म्हैसूर संस्थानांत चितळ जिल्ह्यांत सिद्धपूर, जटिंग, रामेश्वर व ब्रह्मगिरि या तीन ठिकाणी आहेत.
अशोकाच्या कांही आदेशांच्या नकला बैराट, सासाराम व रूपनाथ येथेहि सापडल्या आहेत. बैराट हे स्थान राजपुतान्यात जयपूर संस्थानांत, सासाराम है बिहार प्रांताच्या दक्षिणभागांत, आणि रूपनाथ हे ठिकाण मध्यप्रांतांत जबलपूर जिल्ह्यात आहे. याशिवाय निजामच्या राज्यांत मस्की येहि एक लघु गिरिलेख सन १९१५ साली सापडला. राजपुतान्यांत बैराटच्या जवळ भाब्रू येथेहि एक लघु गिरि-लेख होता. हल्ली तो तेथून काढून कलकत्वास नेण्यांत आला आहे. हा लेख फार महत्त्वाचा आहे. कारण, अशोकानें बौद्धधर्म स्वीकारल्याचा यांत पुरावा आहे. यात विरत्नांचा (बौद्ध, धर्म व संघ हीं तीं तीन रले होत) व कित्येक बौद्धांविषयींचा स्पष्ट उल्लेख आहे.
अशोकाच्या एकंदर सगळ्या लेखांची यादी एके ठिकाणी पाहण्यास मिळावी.
म्हणून ती येथे देतो-
लेखाचें वर्णन | संख्या | काळ | अभिषेकानंतरचें वर्ष |
लघु गिरिलेख | ३ | ख्रि.पू. २५७ | १३ |
भावलेख | १ | ख्रि.पू. २५७ | १३ |
आदेश | १४ | २५७-२५६ | १३ व १४ |
स्तंभलेख | ७ | २४३-२४२ | २७ व २८ |
लघु स्तंभलेख | ४ | २४१-२३२ | २९ व ३८ |
स्मारकलेख | २ | २४९ | २१ |
गुहालेख | १ | २५७-२५० | १३ |
कलिंगलेख | १ | २५५-२५६ | १३ |
प्रादेशिकलेख | १ | २५६-२५५ |
एकूण | ३४ |
लेखांची भाषा : हे सगळे लेख रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना कळावे म्हणून मुद्दाम तीर्थयात्रेच्या वाटेवर अलंकार- विरहित सोप्या भाषेत व प्रादेशिक लिपत कोरून ठेविलेले आहेत. हे सगळे लेख प्राचीन मागधी भाषेत असून मनसेरा व शहाबाजगढ़ी या ठिकाणचे लेखाखेरीज करून बाकीचे बहुतेक सगळे लेख ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. ही लिपि आपल्या बालबोध किंवा मोडी लिपीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिलेली आहे. पण मनसेरा व शहाबाजगढी येथील लेख खरोष्ठी लिपीत फारशीप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिलेले आहेत. अशोकाच्या वेळी व त्यानंतरहि दीर्घकाळपर्यंत हिंदुस्थानातल्या बहुतेक सगळ्या भागांतून ब्राह्मी लिपीतच लिहिण्याचा प्रघात होता. प्राचीन गांधारदेशात (पेशावर, रावळपिंडी, काबूल वगैरे प्रदेश) जे प्राचीन काळचे भग्नावशेष सापडले आहेत, त्यात कांहीं शिक्के आहेत. त्यावरची अक्षरें ब्राह्मीलिपींतच आहेत. काही शिक्क्यांवर मात्र ब्राह्मी व खरोष्टी या दोन्ही लिपींतली अक्षरे आहेत.
ब्राह्मी लिपि – ब्राह्मी लिपि अस्सल भारतीय आहे की विदेशी आहे यासंबंधान अनेक हिंदी व पाश्चात्य पंडितात पुष्कळ मतभेद आहे. डॉ. टॉमस, गोल्डस्टकर, राजेंद्रलाल मित्र, लासेन प्रभृति पंडित ब्राह्मीलिपि अस्सल स्वदेशी म्हणणारे आहेत. उलटपक्षीं वेबर, टायलर, बेन्फी, सर विल्यम जोन्स, बूलर प्रभृति पंडित म्हणतात की ब्राह्मी लिपि विदेशियांकडून हिंदुस्थानात आली. या दुसऱ्या पक्षात पुनः उत्तर सेमिटिक
किंवा फिनिशियन लिपीपासून ब्राह्मी लिपि निघाली असे म्हणणारा एक उपपक्ष, वती दक्षिण सेमिटिक म्हणजे अरबी वगैरे लिपीपासून निघाली असे म्हणणारा दुसरा उपपक्ष असे दोन उपपक्ष आहेत. या लिपि-उत्पत्तीच्या वादात शिरण्याचे आपणास कारण नाही, म्हणून हा विषय येथेच सोडून देऊ.
“खरोष्ट्री लिपि – ब्राह्मी लिपि मूळ ब्रह्मदेशापासून आली म्हणून तिला ‘ब्राह्मी’
हैं नांव पडले अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे खरोष्ट्री किंवा खरोष्टी हे नांव दुसऱ्या लिपीला मिळण्याचे कारण तिच्यातल्या अक्षराचे खर म्हणजे गर्दभ आणि उष्ट्र म्हणजे उट याच्या आकारांशी साम्य आहे असेहि म्हणणारे आहेत. पण हे केवळ वरवर पाहणारांचे मत आहे हे उघड आहे. चिनी ग्रंथांतून अशी हकीकत दिलेली आहे की खरोष्ट नावाच्या एका विद्वान् माणसाच्या नावावरून त्याने शोधून काढलेल्या या लिपीला हे नांव मिळाले. ‘
अशोकाच्या कल्पनेचें अपूर्वत्व – अशोक याने सर्वसाधारण जनतेमध्ये आपल्या धर्ममताचा प्रचार करण्यासाठी त्या वेळच्या लोकांच्या बोलींत आपले लेख खोदन ठेविले हैं वर सांगितलेच आहे. अशोकाच्या पूर्वीच्या काळात असे लेख कोरून ठेविल्याचे उदाहरण आढळत नाहीं, यावरून अशोकानेच हा प्रघात प्रथम घातला असला पाहिजे असे अनुमान काढण्यास हरकत दिसत नाहीं. अशोकाच्या काळाच्या पुष्कळ अगोदरपासून लिहिण्याची कला हिंदुस्थानच्या लोकांना अवगत होती ही गोष्ट निर्विवाद आहे. तथापि त्या काळीं विद्येचा प्रसार उच्च वर्गापुरताच झालेला होता. ज्ञानाचा प्रसार विशिष्ट वर्गामध्येच मर्यादित होऊन न राहता तो यच्चयावत् प्रजेमध्ये व्हावयास पाहिजे अशी स्पृहणीय आकांक्षा अशोकपूर्वकालीन कोणाहि राजानें धरल्याविषयींचें प्रमाण आढळत नाहीं. या दृष्टीने पाहता अशोक हा एका नव्या युगाचा प्रवर्तक होता असे म्हटलें पाहिजे. अशोकाच्या या लेखाचे महत्त्व दुसऱ्याहि अनेक दृष्टींनी आहे. त्याचे विवेचन अन्यत्र केलें आहे.
अशोकाने प्रजेच्या हिताचीं अनेक कृत्ये केली. पण दोन हजार वर्षांपूर्वीचे त्याचे लेख जर आज उपलब्ध न होते, किंवा उपलब्ध होऊनहि ते वाचण्याची व त्यांचा अर्थ लावण्याची किल्ली सापडली नसती, तर अशोकासारख्या उज्ज्वल कीर्तीच्या राजाच्या कारकीर्दीचें दालन बंदच राहून हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची फार मोठी हानि झाली असती. पण तो दुर्दैवाचा प्रसंग परमेश्वरकृपेनें टळला आणि एका विलक्षण
उद्योगौ पाश्वात्य गृहस्थाच्या परिश्रमाने से दालन उघडले जाऊन त्या दालनात प्रविष्ट होऊन तत्कालीन इतिहासाचे यथेच्छ अवलोकन करण्याचा प्राप्त झाला, याबद्दल त्या गृहस्थाला व त्याच्या मागून जे संशोधक झाले त्या सर्वांना धन्यवाद देणे अगदी योग्य आहे. अशोकाच्या इतिहासाचा उद्धार कशा रीतीने झाला. कथा फार गमतीची आहे, म्हणून ती येथे थोडक्यात
अशोकाचे लेख कसे वाचले गेले? – चार्लस टर्नर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने प्रथम सिंहली पंडितांच्या साह्याने पाली भाषेचा अभ्यास करून सिंहलद्वीपांतले महावंश व दीप हे दोन ग्रंथ वाचले ह्यांत अशोक हा बौद्ध धर्मा मोठा पुरस्कर्ता राजा मगध देशांत होऊन गेला व त्याने अनेक गिरिलेख व शिलालेख वगैरे मागे ठेविले आहेत असा उल्लेख त्याला आढळला. सदर राजाचा काळ व त्याच्या पूर्वजांची वगैरे नावेहि त्या ग्रंथात दिली होती. तेव्हा हा कोणी पौराणिक राजा काल्पनिक व्यक्ती नसून ऐतिहासिक पुरुष असला पाहिजे अशी त्याच्या मनाची खात्री झाली व या राजाविषयी अधिक माहिती मिळविण्याच्या हेतुन त्याने सिंहलद्वीपांतले दुसरेहि बौद्ध ग्रंथ चाळले व मिळालेल्या माहितीच्या आधारान त्यानें बौद्ध धर्माचा संगतवार इतिहास लिहिला.
इकडे हिंदुस्थानांत मि. जेम्स प्रिन्सेप नांवाचे एक मोठे इंग्रज अधिकारी होते. यांना प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाचा नाद होता. त्यांनी अशोकलेखांतली अ प्रथम वाचली. त्यांच्या पूर्वी एक दोषां विद्वानांनी ती वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण तो निष्फल झाला होता. इ.स. १७९५ या साली लेफ, विल्फोर्ड इ.स. १८३४ साली मि. स्टालिंग यांनी असे प्रयत्न केले होते. पण त्या कामी यश मिळण्याचे स्यांच्या भाग्यांत नव्हते. ते श्रेय अखेर प्रिन्सेप याला मिळाले. प्रिन्सेप साहेबाने पुष्क प्राचीन नाणी, शिक्के व शिलालेख यांच्या नकला घेतलेल्या होत्या. त्याप्रमाणे सांची येथील स्तूपावरच्या लेखांच्याहि त्यानें नकला केल्या, आणि त्या वाचण्याचा प्रयत्न करीत असता त्या प्रत्येक लेखातली शेवटची दोन अक्षरे याने परस्परांशी ताडून पाहिली व त्यावरून असा तर्क केला की हे कोणातरी राजाने केलेले दानपत्र असावे, व ‘दान’ ही किंवा या अर्थाची दुसरी काही तरी ती अक्षरे असावी; ‘दान’ ही ती अक्षरें असली तर त्यांच्या मागचा शब्द अर्थात् में दान करणाराचे नांव असले पाहिजे; अशी तर्कसरणी चालविता चालविता त्याला अखेर ‘पियदस्सि’ हा शब्द ओळखता आला. अशा रीतीनें महत्प्रयासाने एकेक शब्द लावीत लावीत त्यानें त्या काळी उपलब्ध असलेले सगळे लेख वाचून काढले व जगाला आपला शोध कळविला या शोधाने प्राचीन इतिहासाच्या संशोधकांना एक नवी दृष्टि प्राप्त झाली. किंबहुना इतिहास संशोधनाचे नवे युग उजाडले.
पियदस्सि पुष्कळ बहुतेक सगळ्या लेखातून ‘पियदस्सि’ हे नाव वाचण्यात आले, तेव्हा हे सगळे लेख ‘पियदस्सि’ नावाच्या कोणा तरी राजाचे असावेत हे ठरले. पण हा पियदस्सि कोण, कुठला, केव्हा होऊन गेला वगैरेची माहिती नव्हती. ती टर्नर याने सिंहलद्वीपातल्या बौद्ध धर्माचा जो इतिहास लिहिला होता त्यावरून मिळाली, आणि अशा रीतीने पियदस्सि व अशोक या दोन नावाची सांगड घातली गेली. इतर प्रमाणावरूनहि प्रियदर्शी व अशोक ही एकच व्यक्ती ही गोष्ट निर्विवाद ठरली. याबद्दलचे विवेचन मागे एका प्रकरणात करण्यात आलेच आहे.
प्रो. राधाकुमुद मुकर्जी यांनी अशोकासबंधाच्या इतिहास-संशोधनात कसकशी प्रगती होत गेली आहे त्याची एक मंत्री आपल्या Asoka [ Gackwad Lectures] या ग्रंथाच्या प्रस्तावनेत दिली आहे. ती अशी-
जंत्री
इ. स. १७५० मध्ये पाद्री टीफेनथेलर (Padre Teffenthaler) यांच्या नजरेस दिल्ली – मीरत स्तंभाचे काही भग्नावशेष पडले.
१७८५ मध्ये मि. हॅरिंग्टन याला बाराबर व नागार्जुनी येथील गुहांचा शोध लागला, याच सुमारास कॅप्टन मॉलिएर यास दिल्ली-तोप्रास्तभाचा शोध लागून त्यानें त्यावरील लेखाची नक्कल करून सर विल्यम जोन्स या पंडिताला दिली.
१८०१ मध्ये ‘एशिआटिक रिसर्चेस’ नावाच्या मासिकात अशोकाच्या काही
लेखाच्या नकला प्रसिद्ध झाल्या. १८२२ मध्ये कॅ. टॉड यांना गिरनार पर्वतावरला लेख सापडला.
१८३४ मध्ये अलाहाबादच्या स्तंभलेखाची नक्कल व प्रिन्सेप साहेबाने ओळखलेल्या अशोककालीन लिपींतल्या कांही अक्षरांची माहिती प्रसिद्ध झाली.
१८३६ मध्ये पंजाबच्या रणजितसिंगांच्या नोकरीत असलेल्या एका फ्रेंच ऑफिसरला शहाबाजगर्दीतल्या गिरिलेखाच शोध लागला.
१८३७ मध्ये प्रिन्सेप साहेबाच्या अविश्रांत परिश्रमांमुळे अशोकाचा दिल्ली-तोप्रा स्तंभलेख त्याला प्रथमच वाचता आला. याच वेळीं लौडिय-अरराज, लौडिय- नदनगड व धौली येथील लेखांचा शोध लागला,
१८३८ मध्ये प्रिन्सेपनें गिरनार व धौली येथील लेखाची तुलना एकच आहेत असे दाखविले
१८३९ मध्ये सहसारामच्या लेखाचा शोध लागला.
१८४० मध्ये अशोकाच्या लेखाच्या नकला लक्ष त्यांच्याकडे वेधिलें गेले. । युरोपखंडात जाऊन पाश्चात्य पंडिताचे १८५० मध्ये जौगडचा लेख मिळाला व तो गिरनार, धौली व शहाबा येथील लेखासारखाच आहे असे आढळून आले.
१८६० मध्ये कालसी लेख सापडला,
१८७२ मध्ये वैराटचा लघु लेख दृष्टोत्पत्तीस आला. याच वेळी रूपनाथ रामपूर्वा येथील लेखांचाहि शोध लागला. Indicarun
१८७९ मध्ये जनरल कनिगद्याम याचा Corpus luscriptionum नावाचा प्राचीन लेखासंबधाचा अपूर्व ग्रंथ इंग्रजीत प्रसिद्ध झाला.
१८८२ पासून १९०५ पर्यंत आणखी कित्येक लहान मोठे लेख सापडले १९१५ मध्ये निजामसरकारच्या राज्यांत मस्की येथे एका इंजिनिअरला एक सापडला. यात अशोकाचे प्रत्यक्ष नाव आलेले आहे म्हणून या लेखाचे महत्त्व वा आहे.
प्रो. मुकर्जी यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर याच वर्षी (१९२८ मध्ये) ओरिस प्रांतात अशोकाचा आणखी एक लेख गौतमबुद्धाच्या जन्म स्थानासंबंधाचा साप आहे.
Introductory information about Chakravarti Emperor Ashoka’s writings
More Stories
Dhamma Dhwaj Vandana धम्म ध्वज वंदना
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu