June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विस्तापित बौद्ध समाज – आद. आयु. सयाजी वाघमारे

१४ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्मात्तरीत झालेला पूर्वीश्रमीचा महार समाज, हिंदू धर्मातील अस्पृश्य म्हणून आप आपल्या जाती संस्थेचे नीति नियम , रितिभाती ,पूजाअर्चा , देवदेवता अगदी कटाक्षाने पाळून आपल्या महार जातीत बंदिस्त होते. विदर्भ- मराठवाड्यात लाडवान , बावणे , कोसे, आंदवन, बारके, निकोसे, गोडवान इत्यादी महारांच्या बारा पोट जाती होत्या.आणि त्यांच्या मध्ये लग्न कार्य होत नव्हती .धर्मांत्तर नंतर महार समाज खेडी सोडून शहराकडे स्थलांत्तरीत झाला.

निरनिराळ्या गांव-खेड्यातून शहरात आलेला महार माणूस स्वतःला बौद्ध म्हणवून घेवू लागला .परंतु बौद्ध म्हणून समूहाची ओळख निर्माण होवू शकली नाही. कारण बौद्ध म्हणून रीतिरिवाज , पूजाआर्चा सणवार इत्यादी विषयी धर्मांतरित बौद्ध माणसाला शिकवण मिळाली नाही . शहरात आलेला बौद्ध माणूस सर्वात प्रथम कुठल्यातरी रिपब्लिकन पक्षाचा सभासद झाला. परंतु धर्मांतर होऊन आज ६५ वर्ष उलटली आहे . बौद्ध समाजाचं अस्तित्व निर्माण झालेल नाही.

मजूर कामगारांच्या वसाहती मध्ये एखाद्या दरवाज्यावर जयभीम लिहिलेले किंवा घरातील भिंतीवर साईबाबा , हाजीमलंगबाबा, दिवंगत घरातील व्यक्तीच्या फोटोबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर , गौतम बुद्धांचा फोटो असतो, हे असते बौध्द माणसाचे घर.

१ जनेवावरी भिमा कोरेगाव , २० मार्च चवदारतळे महाड , विजयादशमी नागपूर ,६ डिसेंबर चैत्य भूमी दादर येथे लाखोचा संयखेनी एकत्र येणार समाज घरी गेल्यानंतर कुठे लुप्त होतो ? बौद्ध समाज आज देखील भीतीग्रस्थ म्हणुन जगतो आहे . कारण तो स्वतःला एकटा समजतो.

गावं खेड्यात महार जातीत जगताना, माणूस एक दुसऱ्याला ओळखत होता. एक दुसऱ्याचा मदतीला धावून जात होता. शहरात आलेला बौद्ध माणूस आज देखील एक एकटा आहे . विस्तापित आहे . हे चित्र बदळण्यासाठी प्रत्येक बौद्ध माणसानं बदलणे गरजेचे आहे.

 

✒️ आद आयु सयाजी वाघमारे
📱703 948 3438 , 989 206 6967

संकलन : विलास पवार , कल्याण
📞 9137662424