भाग – २
जातीव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने
पण माझ्या विचारावर कोणी सेन्सॉर केलेले मला चालणार नाही.’ या शब्दात लेखी पत्र देऊन सुनावले. पुढे ही परिषद झाली नाही व अध्यक्षीय भाषणही झाले नाही. एवढे सर्व झाल्यावर, ‘आत्ता स्वागत समितीने अध्यक्षीय भाषणात एका अक्षरात बदल न करता स्वीकारले तरी मी येणार नाही’ असे स्पष्ट केले या सर्व प्रकरणातून तत्कालीन समाज सुधारकांचा जातिनिर्मूलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती पारंपरिक व संकुचित होता हेच लक्षात येते.
ही परिषद शेवटी झालीच नाही. तोपर्यंत बाबासाहेबांचे हे अध्यक्षीय भाषण छापून तयार झाले होते. ते त्यांनी ‘speech prepared by Dr. B.R. Ambedkar for the 1936 Annual Conference of the Jat-Pat-Todak mandal of Lahor BUT NOT DELIVERED‘ अशी टिपणी देत प्रसिद्ध केले. या पुस्तकाच्या प्रती लगेच संपल्या. सन १९३७ ला द्वितीय आवृत्ती व सन १९४५ ला तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. दुस-या आवृत्तीत म. गांधींनी या पुस्तकाची केलेली समीक्षा व त्याला बाबासाहेबांनी दिलेले उत्तर यांचा समावेश केला आहे. तिसरी आवृत्ती ही दुस-या आवृत्तीचे पुनर्मुद्रण आहे.
मराठी अनुवादासाठी आम्ही दुस-या आवृत्तीची निवड केली आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे प्रथम आवृत्तीत राहिलेल्या छपाईतील चुका दुस-या आवृत्तीत सुधारल्या होत्या. दुसरे कारण म्हणजे म. गांधीजींनी ‘हरिजन’ मध्ये या ग्रंथावर केलेल्या समीक्षेचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यात केला आहे. तसेच जात-पात तोडक मंडळाची या प्रकरणासंबंधीची व गांधी यांच्या भूमिकेसंबंधीची भूमिका मांडणा-या संत राम यांच्या लेखाचाही समावेश आहे. त्याचबरोबर म.गांधी यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले होते, त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलमवार (एकूण ११ कलमे) दिलेले उत्तर या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनुवाद करताना भारतभूषण प्रिंटिंग प्रेसने छापलेल्या द्वितीय आवृत्तीची (१९३७) निवड करणे योग्य असल्याचे स्पष्ट होते.
इंग्रजीमधील डॉ. बाबासाहेबांच्या सर्व ग्रंथांचा मराठी अनुवाद करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. या अनुवाद प्रकल्पाचा विचार करून निर्णय घेण्यासाठी व समितीस शिफारस करण्यासाठी समितीच्या दिनांक २९ फेब्रुवारी २०१२ च्या बैठकीत ‘अनुवाद समिती’ गठित करण्याचा निर्णय होऊन ‘अनुवाद समिती’ गठित केली आहे. त्यात पूर्वसदस्य प्रा. दत्ता भगत, प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे व डॉ. ताराचंद खांडेकर या उपसमितीचे सदस्य आहेत. सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस हे या समितीचे काम बघतील. या समितीचे कार्य चालू आहे. ‘अनाईलेशन ऑफ कास्ट’ या निबंधाची खास अमृतमहोत्सवी आवृत्ती काढावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहचवून हा महोत्सव साजरा करावा.
🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७