June 14, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२३- २४ करीता नवीन अर्ज करण्यासाठी जाहीर प्रसिद्धी निवेदन

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दि. १३ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णया अन्वये (शासन निर्णय क्र. बीसीएच- २०१६/प्र.क्र. २९३/शिक्षण-२, दि.१३/०६/२०१८) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येत आहे.
लाभाचे स्वरुप : सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये खालीलप्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे.
लातूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच लातूर महानगरपालिकेच्या हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविदयालये/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय वार्षिक रक्कमभोजन भत्ता २५,०००/-
निवास भत्ता १२,०००/-
निर्वाह भत्ता ६,०००/-
प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम ४३,०००/-
टीप : वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रु.५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकषः
१. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा. २. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. ३. विद्यार्थ्यांने जिल्हास्तरावरील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. ४. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. ५. विद्यार्थ्यांस इयत्ता १०वी / ११वी/१२वी/पदवी/पदविका मध्ये किमान ५०% पेक्षा जास्त गूण असणे अनिवार्य आहे. ६. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०% असेल. ७. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. ८. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील तो स्थानिक रहिवासी नसावा. ९. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच लातूर महानगरपालिका हद्दीपासून ०५ कि.मी.च्या परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा. १०. विद्यार्थ्यांने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा ०२ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. ११. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल.
अर्ज भरण्याचे संकेतस्थळ http://syl.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अंतिम मुदत  दि. ३०/०१/२०२४ ते २९/०२/२०२४ या
कालावधीत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची १ प्रिंट आवश्यक कागदपत्रासह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करुन सबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सही शिक्यासह दि. २८.०२.२०२४ रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास दाखल करणे बंधनकारक आहे.
( टीप:- विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना अचूक भरणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्रे सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात
येतील व अपात्र, त्रूटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. )
अधिक माहितीसाठी – ७६२००१९४८४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा.
– स्वाक्षरीत –
(शिवकांत चिकुर्ते )
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण लातूर